Skip to main content

Posts

Showing posts from 2025

कोकणस्थ - मातीची ओढ

  कोकणस्थ - मातीची ओढ आपल्यातल्या बऱ्याच लोकांना शहरातील धावपळीचं आयुष्य आवडत नाही.  गावाकडे निवांत रहावस वाटतं.  पण इथे सगळ्याच गोष्टींची पाळंमुळं अशी रोवलेली असतात की इथून सगळं बस्तान गावाला हलवू शकत नाही.  पण कोकणस्थ या पुस्तकात प्रज्ञा ताईंनी गावी घर बांधून कॉंक्रिटच जंगल सोडून आपल्या मातीत राहण्याचा निर्धार केला.  हे पुस्तक वाचताना प्रज्ञा ताईंच्या नजरेतून आपण कोंकणच नवं रूप पाहतोय इतके आपण या पुस्तकात गुंतून जातो.  प्रत्येक प्रसंग आपण डोळ्याने पाहतोय इतक्या उत्तम शब्दात प्रज्ञा ताईंनी तो डोळ्यासमोर उभा केलाय.  ताईंच्या गीताई बंगल्याचा, त्याच्या आजूबाजूच्या वाडीचा, घरामागच्या ओहोळाचा, तिथे उपस्थित माणसांचा, निसर्गाचा सगळ्याच गोष्टींचा आपण एक भाग होतो.  स्वतःचा व्यवसाय सांभाळून गावाकडची ओढ त्यांनी कायम ठेवली आणि त्यामुळेच त्यांचं स्वप्न त्यांना जगता आलं.  गावाकडच्या बऱ्याच विषयांना त्यांनी मार्मिक पद्धतीने हात घातला आणि एक वेगळा दृष्टिकोन वाचकांसमोर उभा करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. ...

पुंडलिक सदाशिव लोकरे

  ऑक्टोबर २००९ मधली आमची पहिली भेट. बिजनेस नेटवर्किंगची माझ्या आयुष्यातली पहिली मिटिंग. मी हिमतीने एका अमिताभसारख्या उंची असणाऱ्या आणि तसाच धीरगंभीर आवाज असणाऱ्या पुंडलिकशी संवाद साधला. पण तो पहिल्या भेटीत काही मला रुचला नाही. पुढे मिटींग्सच्या निमित्ताने वरवर भेट होत राहिली. पण एकदा त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्याशी बराच वेळ संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यात हा फणसारखा माणूस मला उमगला. बाहेरून काटेरी जरी भासवत असेल (तो भासवतो पण तसा नाही तो) तरी आतून इतका गोड की त्याच्यासारखा माणूस मला आजतागायत सापडला नाही. आयुष्यातले बरेच चढउतार पाहिल्यावर अगदी स्पष्टवक्तेपणा आणि कणखरपणा आलेला पुंडलिक मला कधी कुणाची उगाच स्तुती आणि त्यावरूनही निंदानालस्ती करताना आढळला नाही. जे आहे ते त्या त्या व्यक्तीच्या तोंडावर सांगून मोकळा झाला. त्यामुळे मनात एक आणि बाहेर एक अशा द्विधा मनस्थितीत मला तो कधी दिसलाच नाही. तो ज्यांना कळला ते त्याचे एकदम खास झाले आणि ज्यांना नाही ते त्याच्या वाटेला थांबलेच नाहीत. तो मला भावला आणि माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. पुंडलिक सर ते पुंडलिक हा प्रवास काही दिवसा...

नाझी नरसंहार - आउशवित्झ छळछावणी

नाझी नरसंहार - आउशवित्झ छळछावणी "बेटा, इंसान पहले जानवर था...कुछ लोग जानवर से इंसान हुवे और कुछ लोग जानवर ही रह गये", क्रिमिनल जस्टिस या वेबसिरीज मधला हा एक डायलॉग...पण "नाझी नरसंहार" हे पुस्तक वाचताना तो तंतोतंत जुळतो.  माणूस जेव्हा त्याची नैतिक मानसिकता हरवून बसतो तेव्हा तो राक्षसी कृत्य करत कोणत्या पातळीवर येऊ शकतो हे हिटलरच्या म्हणजेच नाझींच्या कृत्यातून जगासमोर आलं.  पहिल्या महायुद्धात हरल्यानंतर ज्यूंचा दु:स्वास करणाऱ्या हिटलरने जर्मनीची सत्ता हाती घेतली आणि दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले.   फक्त ज्यू लोकाना मारण्यासाठी आउशवित्झ या जर्मनीने जिंकलेल्या पोलंडच्या भागात कत्तलखाना उभारण्यात आला.  युरोपातल्या जवळपास ६० लाख ज्यू लोकांना शोधून अगदी जनावरापेक्षाही वाईट अवस्थेत रेल्वेगाडीतून आउशवित्झ या ठिकाणी आणले जायचे आणि गॅस चेंबरमध्ये सगळ्यांना ग्रुप्स मध्ये कोंबून  त्यांच्यावर अँसिड टाकून मारले जायचे.  यामध्ये महिला, लहान मुले, वयस्कर असा भेदभाव केला गेला नाही.  जसे प्राण्यांवर औषध चाचणीचे प्रयोग केले जातात तसेच प्रयोग ज्यू लोकांवर केले गेले आणि त्य...

इंडस्ट्री 4.0 ते 5.0

  इंडस्ट्री 4.0 ते 5.0 – तंत्रज्ञानाचा अद्भुत प्रवास (लेखक: अच्युत गोडबोले) आपल्या आजूबाजूला तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, बिग डेटा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, 3D प्रिंटिंग, ब्लॉकचेन, 5G अशा अनेक संकल्पना गेल्या काही वर्षांत सर्वत्र ऐकायला मिळतात. पण या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष आपल्या जीवनावर, व्यवसायावर आणि समाजावर काय परिणाम होतो? भविष्यात या गोष्टी कोणत्या रूपात दिसतील? या सर्व प्रश्नांची उत्तरे अत्यंत सोप्या, थेट आणि सखोल पद्धतीने करून देणारे अच्युत गोडबोले सरांचे पुस्तक म्हणजे “इंडस्ट्री 4.0 ते 5.0”. एका नॉन टेक्नोसॅव्ही माणसाला सुद्धा सहज समजेल इतक्या सोप्या आणि रंजक भाषेत हे लिहीलं गेलंय.  इंडस्ट्री 4.0 म्हणजे नेमके काय, त्याचा इतिहास आणि संकल्पना, AI, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, ChatGPT, तसेच AR/VR, IIoT, ब्लॉकचेन, 5G, 3D–4D प्रिंटिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा परिचय, तंत्रज्ञानाचा केवळ औद्योगिक वापर न मांडता त्यामागील मानवी दृष्टीकोन आणि सामाजिक बदल, भविष्यातील इंडस्ट्री 5.0 यावर प्रकाश ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत. हे पुस्तक केवळ ...

अडोलसन्स

  अडोलसन्स एक वेगळा विषय म्हणून बरीच चर्चा झालेली अडोलसन्स ही नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज पाहिली. अगदी मोजक्या ४ एपिसोडमध्ये विषयाचं गांभीर्य मांडण्यात दिग्दर्शक आणि टीम यशस्वी झाली आहे. एक जेमी नावाचा १३ वर्षाचा मुलगा आपल्याच वर्गातल्या मुलीचा खून करतो आणि त्याबद्दलच्या इन्वेस्टीगेशन बाबतीतच ही वेबसिरीज आहे. पहिल्या एपिसोडमध्ये अटक, दुसऱ्या एपिसोडमध्ये शाळेचं वातावरण, तिसऱ्या एपिसोडमध्ये जेमीची मानसिकता आणि चौथ्या भागात जेमीच्या कुटुंबियांना समाजाचा होणारा त्रास अशा सगळ्या अँगलना कव्हर करत ही वेबसिरीज आपल्याला विचार करायला भाग पाडते. अगोदर नाटकासारखी रिहर्सल करून सलग शूट झालेला प्रत्येक एपिसोड असल्यामुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे अजून जिवंतपणा आणि नैसर्गिकता येते. मुलं लहान असल्यापासून पालक म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणारे आपण त्यांना कायम मॉनिटर्ड ऍक्सेस देणं विसरतो आणि मुलांची प्रायव्हसी म्हणून आपण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतो. मुळात ते द्यायलाच हवं पण ते एका विशिष्ट वयानंतर. पौगंडावस्थेत असताना (खासकरून १२ ते १७ वयोगट) आपल्यासमोर अगदी सहज वावरणारी बरीच मुले इंटरनेटच्य...

येताव

  सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघ यांच्या सौजन्याने "येताव" या आपल्या ऍपला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली. गेल्या काही वर्षात नावाजलेले व बऱ्याच न्यूज चॅनेलने / न्यूज पेपरने कव्हर केलेले पण या ना त्या कारणाने येताव ठप्प झाले होते. स्वामींच्या मठात आनंद दादाने याबाबतीत स्वामींना मनापासून आवर्तने केली होती. त्याची हाक स्वामींपर्यंत पोहचली. काही दिवसांपूर्वी नितीन वाळके सरांचा फोन आला की "मालवणात रिक्षा स्टैंड वर उभ्या असतात तर प्रवासी त्यांच्यापर्यंत आपल्या येताव ऍपद्वारे पोहचू शकतील का?". हा प्रश्न मालवणमधील रिक्षा चालक संदीप गावकर भाऊ यांनी नितीन सरांकडे मांडला होता. इथून या संकल्पनेवर नितीन सरांच्या मदतीने काम चालू झाले आणि ते प्रत्यक्षात उतरले देखील. हे ऍप रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यासाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा मानस होता. प्रोसेस तशी सोपी होती, रिक्षा वाले ज्या स्टँडवर आहेत ते लोकेशन त्यांनी ऍपवर सेट करावे आणि पॅसेंजर ने त्या लोकेशनला सर्च केले तर त्यांना तिथे उपलब्ध असलेले रिक्षाचालक दिसावेत आणि त्यानी रिक्षाचा...

जया अंगी मोठेपण....

  स्वतःच्या आवाजासाठी प्रसिद्ध असणाऱ्या हॅना चॅप्लिन यांच्या हाऊसफुल असणाऱ्या शो मध्ये परफॉर्मन्स करताना अचानक आवाज चिरकला आणि काही केल्या पुढील कार्यक्रम होईल याची शाश्वती नसताना विंगेत असलेल्या ५ वर्षाच्या चार्लीने तो परफॉर्मन्स आईऐवजी स्वतः करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले. हाच त्याच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स. आईचा आवाज गेल्यावर पैसे यायचे बंद झाले आणि अत्यंत दारिद्र्यामध्ये आयुष्य काढावे लागले. दारूमुळे आपल्या आईशी घटस्फोट घेतलेल्या बाबांकडूनही पैसे येणे बंद झाले. आईने शिवणकाम करुन घर चालवण्याचा केलेला प्रयत्नही तितका यशस्वी होत नव्हता आणि त्यामुळे उपाशीपोटी राहण्याची सवय चार्लीला लहानपणापासूनच लागली. या सगळ्या घटनांमुळे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने याला वर्कहाऊसमध्ये जावं लागलं. तिथे स्वतःची चूक नसताना शिक्षा भोगाव्या लागल्या. यातच आईला वेडाचा झटका आला आणि ती वेड्यांच्या इस्पितळात दाखल झाली. कोर्टाच्या आदेशामुळे वडिलांच्या राहत्या घरात सावत्र आईसोबत काही दिवस काढावे लागले. इथे काम केल्याशिवाय चार्लीला जेवण सुद्धा मिळत नव्हतं. शाळेतून घरी येऊन त्याला काम...

आपली संस्कृती ते प्रगती - राजेश मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रा. लि.

  काल राजेश इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. या वसईतील कामन विभागातील कंपनीला भेट देण्याचा योग आला. राजाराम फुलेजी यांना यावर्षी "महाराष्ट्र बिझनेस क्लब" प्रस्तुत "उद्योग गर्जना २०२५" मध्ये "उद्योगतारा" या सन्माननीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अडवायजारी बोर्ड मेंबर महेश चव्हाण यांच्यामुळे राजारामजींची ओळख झाली होती. महेश कडून त्यांच्या कंपनीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि ते काल प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. वेळेच्या जवळपास पाऊणतास आधी आम्ही त्यांच्या फॅक्टरीला पोहचलो. वसई स्टेशन तिथून लांब असल्यामुळे कार घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्यासोबत माझे मित्र आणि पार्टनर्स अमित देशमुख आणि अमित लाकरा होते. गेटबाहेरुनच कंपनीचा पसारा काय आहे याचा अंदाज आला. गेटपासून आतल्या भिंतीवर थोड्या थोड्या अंतरावर खूप चांगले मराठी / हिंदी असे मोटिव्हेशनल कोट्स लावले होते. आम्ही आत गेल्या गेल्या अकाउंट डिपार्टमेंट चे हेड आमच्याकडे आले आणि हात जोडून "गुड मॉर्निंग...वेलकम टू राजेश इंडिया" म्हणून आमचं स्वागत केलं. गाडी पार्किंग एरिया मध्ये पार्क करून आम...

आशिष पेठे सरांची मुलाखत

 बरेच वर्ष उद्योगात असल्याने किंवा मुळात बिजनेस नेटवर्किंगचा भाग असल्याने बऱ्याच लोकांशी भेट होते.  त्यात काही मोठमोठ्या उद्योजकांची सुद्धा भेट होते.  त्यांच्याशी चर्चा होते.  बऱ्याच नव्या गोष्टी कळतात किंवा शिकायला मिळतात.  पण काही व्यक्ती आपल्या आयुष्याला, मनाला स्पर्श करून जातात.  क्वचित असं घडतं की एखाद्या व्यक्तीचं इम्प्रेशन २ दिवस - ३ दिवस सलग डोक्यात राहतं.   माझं तसं झालं.  शुक्रवारी "उद्योग गर्जना २०२५" कार्यक्रमाच्या निमित्ताने वामन हरी पेठे ज्वेलर्सचे पार्टनर श्री. आशिष पेठे सर यांच्यासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली, त्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली आणि हे मी माझं भाग्य समजतो.   यावर्षी महाराष्ट्र बिजनेस क्लब प्रस्तुत "उद्योग गर्जना २०२५" या कार्यक्रमात लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप अँड एक्सिलन्स चे डायरेक्टर श्री. अतुल राजोळी यांच्या रेफेरन्सने आशिष पेठे सरांचा कॉन्टॅक्ट मिळाला.  अरुण सिंह सर, मंगेश यादव सर, दिनेश भरणे सर आणि मी असे चौघे त्यांना निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो....