श्रीमानयोगी वाचण्यापूर्वी मी कै. बाबासाहेब पुरंदरे यांची राजे शिवछत्रपती वाचली होती. मुळात सिरियल्स मधून किंवा सिनेमामधून महाराजांचा इतिहास लोकांसमोर मांडला जातोच. बऱ्याचशा गोष्टी ज्या ऐकल्या किंवा वाचल्या होत्या त्या वेगळ्या पद्धतीने श्रीमानयोगी मध्ये मांडल्या आहेत जसं कि महाराजांनी रायरेश्वरावर शपथ घेतली असं वाचलं होतं पण या कादंबरीमध्ये रोहिडेश्वरावर सांगितली आहे. किंवा अफझलखान स्वारीच्या वेळी सईबाईंचे निधन झाले तेव्हा महाराज त्यांच्यासोबत नव्हते हे वाचलं होतं पण यात महाराज सईबाईंसोबत आहेत हे मांडलं आहे. थोडं गोंधळून मी विनोद दादाला हा प्रश्न विचारला तेव्हा इतिहासकार आणि कादंबरीकार यात फरक असतो हे समजलं. कादंबरीकार गोष्ट लिहिताना बरीच लिबर्टी घेतात त्यामुळे ती गोष्टरूपाने वाचली गेली पाहिजे याचा उलगडा झाला. त्या दृष्टिकोनातून वाचल्यावर हे पुस्तक दमदारच आहे. एक कर्तव्यदक्ष पुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराज निभावत असलेली प्रत्येक भूमिका यात चोख मांडली आहे. स्वराज्याचं तोरण उभारत असताना महाराजांना घरापासून बऱ्याच वेळा लांब राह...
प्रिय काकी, आज तुझ्या सेवानिवृत्ती समारंभात येऊन छान वाटलं. दादाने आमच्यावतीने थोडक्यात पण उत्तमरित्या तुझ्या जीवनप्रवासाचं वर्णन केलं. बोलण्यासारखं माझ्याकडेही बरंच होतं पण तिथे बऱ्याच जणांना बोलायचं होतं आणि असंही जवळच्या व्यक्तींबद्दल बोलताना माझ्या भावना अनावर होतात म्हणून मी तिथे बोलणं टाळलं. त्यासाठीच हा पत्रप्रपंच. बालपणातला बराच काळ मी तुम्हा दोघांसोबत घालवला. तुमच्या लग्नाच्या वेळी मी तिसरी चौथीला असेन. त्या काळात मुलांचे बर्थडे सेलिब्रेट करण्याचं एवढं काही फॅड नव्हतं पण चाळीत दोन तीन सुखवस्तू घरातले बर्थडे बघून माझ्या बालमनात ती ईच्छा निर्माण झाली होती. मी आतापर्यंत कधीच वाढदिवस साजरा केला नाही हे तुला समजल्यावर तू आणि नयना मावशी मिळून घरी येऊन माझा वाढदिवस सेलिब्रेट केलात तो प्रसंग आजही माझ्या मनात ताजा आहे. आता कदाचित वाढदिवस साजरा करणं ही खूप कॉमन गोष्ट आहे पण तीसेक वर्षापूर्वी ती नक्कीच नव्हती. त्यानंतर तुझ्यासोबत पाहिलेला जुरासिक पार्क सिनेमासुद्धा एक वेगळा आणि धमाल अनुभव होता. तुम्हा दोघांच्या लग्नातला मी टोकणा. लग्नात बरेच फोटो काढायला मिळतील या अपेक्षेव...