Skip to main content

Posts

हाऊ टू थिंक लाईक स्टीव्ह जॉब्स - डॅनियल स्मिथ

  स्टीव्ह जॉब्स हे केवळ यशस्वी बिझनेसमन नव्हते, तर जगाकडे पाहण्याची त्यांची दृष्टीही विलक्षण होती. "How to Think Like Steve Jobs" या पुस्तकात डॅनियल स्मिथ यांनी स्टिव्ह जॉब्सला मोजक्या पण इफेक्टिव्ह पद्धतीने लोकांसमोर आणलं आहे. हे पुस्तक जॉब्सच्या आयुष्यातील अनुभव, निर्णय, अपयश आणि यश यांमधून शिकण्यासारखे धडे समोर आणते. जॉब्स यांचा विश्वास होता की खऱ्या अर्थाने नावीन्य हे टेकनॉलॉजी आणि क्रिएटिव्हिटी यांच्या कॉम्बिनेशनमधून जन्माला येते. त्यांनी नेहमीच वेगळा विचार करण्यास, मोठी स्वप्ने पाहण्यास आणि उत्कृष्टतेचा ध्यास घेण्यास प्रोत्साहन दिले. ग्राहकांना काय हवे आहे हे विचारण्यापेक्षा त्यांना भविष्यात काय आवश्यक वाटेल याचा अंदाज घेण्याची त्यांची क्षमता त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवत होती. या पुस्तकात एक मस्त वाक्य आहे, "अलेक्झांडर ग्रॅहम बेलनं टेलिफोनचा शोध लावण्याआधी मार्केट रिसर्च केला होता ?" जो मुख्य मुद्दा या पुस्तकात मांडला आहे तो म्हणजे यश हे केवळ टॅलेंट किंवा लक मुळे मिळत नाही. क्लिअर व्हिजन, डेडिकेटेड एफर्टस, डिटेलिंग आणि आपल्या कामाबद्दल असलेली क्युरिऑसिटी ...
Recent posts

जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण

  श्रीमानयोगी वाचण्यापूर्वी मी कै. बाबासाहेब पुरंदरे यांची राजे शिवछत्रपती वाचली होती.  मुळात सिरियल्स मधून किंवा सिनेमामधून महाराजांचा इतिहास लोकांसमोर मांडला जातोच.  बऱ्याचशा गोष्टी ज्या ऐकल्या किंवा वाचल्या होत्या त्या वेगळ्या पद्धतीने श्रीमानयोगी मध्ये मांडल्या आहेत जसं कि महाराजांनी रायरेश्वरावर शपथ घेतली असं वाचलं होतं पण या कादंबरीमध्ये रोहिडेश्वरावर सांगितली आहे.  किंवा अफझलखान स्वारीच्या वेळी सईबाईंचे निधन झाले तेव्हा महाराज त्यांच्यासोबत नव्हते हे वाचलं होतं पण यात महाराज सईबाईंसोबत आहेत हे मांडलं आहे.  थोडं गोंधळून मी विनोद दादाला हा प्रश्न विचारला तेव्हा इतिहासकार आणि कादंबरीकार यात फरक असतो हे समजलं.  कादंबरीकार गोष्ट लिहिताना बरीच लिबर्टी घेतात त्यामुळे ती गोष्टरूपाने वाचली गेली पाहिजे याचा उलगडा झाला.  त्या दृष्टिकोनातून वाचल्यावर हे पुस्तक दमदारच आहे.  एक कर्तव्यदक्ष पुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराज निभावत असलेली प्रत्येक भूमिका यात चोख मांडली आहे.   स्वराज्याचं तोरण उभारत असताना महाराजांना घरापासून बऱ्याच वेळा लांब राह...

काकी निवृत्त होताना....

  प्रिय काकी, आज तुझ्या सेवानिवृत्ती समारंभात येऊन छान वाटलं. दादाने आमच्यावतीने थोडक्यात पण उत्तमरित्या तुझ्या जीवनप्रवासाचं वर्णन केलं. बोलण्यासारखं माझ्याकडेही बरंच होतं पण तिथे बऱ्याच जणांना बोलायचं होतं आणि असंही जवळच्या व्यक्तींबद्दल बोलताना माझ्या भावना अनावर होतात म्हणून मी तिथे बोलणं टाळलं. त्यासाठीच हा पत्रप्रपंच. बालपणातला बराच काळ मी तुम्हा दोघांसोबत घालवला. तुमच्या लग्नाच्या वेळी मी तिसरी चौथीला असेन. त्या काळात मुलांचे बर्थडे सेलिब्रेट करण्याचं एवढं काही फॅड नव्हतं पण चाळीत दोन तीन सुखवस्तू घरातले बर्थडे बघून माझ्या बालमनात ती ईच्छा निर्माण झाली होती. मी आतापर्यंत कधीच वाढदिवस साजरा केला नाही हे तुला समजल्यावर तू आणि नयना मावशी मिळून घरी येऊन माझा वाढदिवस सेलिब्रेट केलात तो प्रसंग आजही माझ्या मनात ताजा आहे. आता कदाचित वाढदिवस साजरा करणं ही खूप कॉमन गोष्ट आहे पण तीसेक वर्षापूर्वी ती नक्कीच नव्हती. त्यानंतर तुझ्यासोबत पाहिलेला जुरासिक पार्क सिनेमासुद्धा एक वेगळा आणि धमाल अनुभव होता. तुम्हा दोघांच्या लग्नातला मी टोकणा. लग्नात बरेच फोटो काढायला मिळतील या अपेक्षेव...

कोकणस्थ - मातीची ओढ

  कोकणस्थ - मातीची ओढ आपल्यातल्या बऱ्याच लोकांना शहरातील धावपळीचं आयुष्य आवडत नाही.  गावाकडे निवांत रहावस वाटतं.  पण इथे सगळ्याच गोष्टींची पाळंमुळं अशी रोवलेली असतात की इथून सगळं बस्तान गावाला हलवू शकत नाही.  पण कोकणस्थ या पुस्तकात प्रज्ञा ताईंनी गावी घर बांधून कॉंक्रिटच जंगल सोडून आपल्या मातीत राहण्याचा निर्धार केला.  हे पुस्तक वाचताना प्रज्ञा ताईंच्या नजरेतून आपण कोंकणच नवं रूप पाहतोय इतके आपण या पुस्तकात गुंतून जातो.  प्रत्येक प्रसंग आपण डोळ्याने पाहतोय इतक्या उत्तम शब्दात प्रज्ञा ताईंनी तो डोळ्यासमोर उभा केलाय.  ताईंच्या गीताई बंगल्याचा, त्याच्या आजूबाजूच्या वाडीचा, घरामागच्या ओहोळाचा, तिथे उपस्थित माणसांचा, निसर्गाचा सगळ्याच गोष्टींचा आपण एक भाग होतो.  स्वतःचा व्यवसाय सांभाळून गावाकडची ओढ त्यांनी कायम ठेवली आणि त्यामुळेच त्यांचं स्वप्न त्यांना जगता आलं.  गावाकडच्या बऱ्याच विषयांना त्यांनी मार्मिक पद्धतीने हात घातला आणि एक वेगळा दृष्टिकोन वाचकांसमोर उभा करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. ...

पुंडलिक सदाशिव लोकरे

  ऑक्टोबर २००९ मधली आमची पहिली भेट. बिजनेस नेटवर्किंगची माझ्या आयुष्यातली पहिली मिटिंग. मी हिमतीने एका अमिताभसारख्या उंची असणाऱ्या आणि तसाच धीरगंभीर आवाज असणाऱ्या पुंडलिकशी संवाद साधला. पण तो पहिल्या भेटीत काही मला रुचला नाही. पुढे मिटींग्सच्या निमित्ताने वरवर भेट होत राहिली. पण एकदा त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्याशी बराच वेळ संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यात हा फणसारखा माणूस मला उमगला. बाहेरून काटेरी जरी भासवत असेल (तो भासवतो पण तसा नाही तो) तरी आतून इतका गोड की त्याच्यासारखा माणूस मला आजतागायत सापडला नाही. आयुष्यातले बरेच चढउतार पाहिल्यावर अगदी स्पष्टवक्तेपणा आणि कणखरपणा आलेला पुंडलिक मला कधी कुणाची उगाच स्तुती आणि त्यावरूनही निंदानालस्ती करताना आढळला नाही. जे आहे ते त्या त्या व्यक्तीच्या तोंडावर सांगून मोकळा झाला. त्यामुळे मनात एक आणि बाहेर एक अशा द्विधा मनस्थितीत मला तो कधी दिसलाच नाही. तो ज्यांना कळला ते त्याचे एकदम खास झाले आणि ज्यांना नाही ते त्याच्या वाटेला थांबलेच नाहीत. तो मला भावला आणि माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. पुंडलिक सर ते पुंडलिक हा प्रवास काही दिवसा...

नाझी नरसंहार - आउशवित्झ छळछावणी

नाझी नरसंहार - आउशवित्झ छळछावणी "बेटा, इंसान पहले जानवर था...कुछ लोग जानवर से इंसान हुवे और कुछ लोग जानवर ही रह गये", क्रिमिनल जस्टिस या वेबसिरीज मधला हा एक डायलॉग...पण "नाझी नरसंहार" हे पुस्तक वाचताना तो तंतोतंत जुळतो.  माणूस जेव्हा त्याची नैतिक मानसिकता हरवून बसतो तेव्हा तो राक्षसी कृत्य करत कोणत्या पातळीवर येऊ शकतो हे हिटलरच्या म्हणजेच नाझींच्या कृत्यातून जगासमोर आलं.  पहिल्या महायुद्धात हरल्यानंतर ज्यूंचा दु:स्वास करणाऱ्या हिटलरने जर्मनीची सत्ता हाती घेतली आणि दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले.   फक्त ज्यू लोकाना मारण्यासाठी आउशवित्झ या जर्मनीने जिंकलेल्या पोलंडच्या भागात कत्तलखाना उभारण्यात आला.  युरोपातल्या जवळपास ६० लाख ज्यू लोकांना शोधून अगदी जनावरापेक्षाही वाईट अवस्थेत रेल्वेगाडीतून आउशवित्झ या ठिकाणी आणले जायचे आणि गॅस चेंबरमध्ये सगळ्यांना ग्रुप्स मध्ये कोंबून  त्यांच्यावर अँसिड टाकून मारले जायचे.  यामध्ये महिला, लहान मुले, वयस्कर असा भेदभाव केला गेला नाही.  जसे प्राण्यांवर औषध चाचणीचे प्रयोग केले जातात तसेच प्रयोग ज्यू लोकांवर केले गेले आणि त्य...

इंडस्ट्री 4.0 ते 5.0

  इंडस्ट्री 4.0 ते 5.0 – तंत्रज्ञानाचा अद्भुत प्रवास (लेखक: अच्युत गोडबोले) आपल्या आजूबाजूला तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, बिग डेटा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, 3D प्रिंटिंग, ब्लॉकचेन, 5G अशा अनेक संकल्पना गेल्या काही वर्षांत सर्वत्र ऐकायला मिळतात. पण या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष आपल्या जीवनावर, व्यवसायावर आणि समाजावर काय परिणाम होतो? भविष्यात या गोष्टी कोणत्या रूपात दिसतील? या सर्व प्रश्नांची उत्तरे अत्यंत सोप्या, थेट आणि सखोल पद्धतीने करून देणारे अच्युत गोडबोले सरांचे पुस्तक म्हणजे “इंडस्ट्री 4.0 ते 5.0”. एका नॉन टेक्नोसॅव्ही माणसाला सुद्धा सहज समजेल इतक्या सोप्या आणि रंजक भाषेत हे लिहीलं गेलंय.  इंडस्ट्री 4.0 म्हणजे नेमके काय, त्याचा इतिहास आणि संकल्पना, AI, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, ChatGPT, तसेच AR/VR, IIoT, ब्लॉकचेन, 5G, 3D–4D प्रिंटिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा परिचय, तंत्रज्ञानाचा केवळ औद्योगिक वापर न मांडता त्यामागील मानवी दृष्टीकोन आणि सामाजिक बदल, भविष्यातील इंडस्ट्री 5.0 यावर प्रकाश ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत. हे पुस्तक केवळ ...