रणझुंजार
स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन एखाद्या ठीपक्या एवढं साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी हजारो पटींनी त्यांच्या हयातीत वाढवलं. त्यावेळी एवढ्या बलाढ्य शाह्या फोफावलेल्या असताना स्वराज्य स्थापनेचा विचार करण हे सुद्धा धाडसाचं होत. या कार्यात त्यांना कित्येक गोष्टींचा त्याग करावा लागला. कितीतरी धाडसी प्रसंगाना समोर जावं लागलं. स्वतःची दुःख बाजूला सारावी लागली. अफजलखानच संकट स्वराज्यावर घोंगावत असताना त्यांच्या पहिल्या पत्नी सईबाई आपल्या लहान संभाजी राजांना जिजाऊंकडे सोपाऊन हे जग सोडून निघून गेल्या. त्यानंतर संभाजी महाराजांच्या आयुष्यात फक्त संघर्षच लिहिला होता.
स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन एखाद्या ठीपक्या एवढं साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी हजारो पटींनी त्यांच्या हयातीत वाढवलं. त्यावेळी एवढ्या बलाढ्य शाह्या फोफावलेल्या असताना स्वराज्य स्थापनेचा विचार करण हे सुद्धा धाडसाचं होत. या कार्यात त्यांना कित्येक गोष्टींचा त्याग करावा लागला. कितीतरी धाडसी प्रसंगाना समोर जावं लागलं. स्वतःची दुःख बाजूला सारावी लागली. अफजलखानच संकट स्वराज्यावर घोंगावत असताना त्यांच्या पहिल्या पत्नी सईबाई आपल्या लहान संभाजी राजांना जिजाऊंकडे सोपाऊन हे जग सोडून निघून गेल्या. त्यानंतर संभाजी महाराजांच्या आयुष्यात फक्त संघर्षच लिहिला होता.
पुत्रप्रेमाने आंधळ्या झालेल्या सोयराबाईनी सत्तेच्या हव्यासापोटी संभाजी महाराजांना संपवण्याचा प्रयत्न केला. मोगल, इंग्रज, पोर्तुगीज, हबशी यांच्यासोबत लढता लढता त्यांच्यावर स्वकियांशीसुद्धा लढण्याची वेळ येऊन ठेपली. त्यांच्या कारकिर्दीची ९ वर्ष त्यांना फक्त लढतच राहावं लागलं. त्यांनी कोणत्याही परिस्थिती हार मानली नाही आणि निकराने लढा दिला. या गोष्टीचा स्वतः औरंगजेबाला इतका त्रास झाला कि तो भलेमोठे सैन्य घेऊन स्वतः संभाजी महाराजांना संपवण्यासाठी दक्षिणेत उतरला. त्यातही महाराजांनी मोगलांना निकराचा लढा दिला व शेवटी महाराजांचे मेहुणे गणोजी शिर्के यांनी संभाजी महाराजांच्या संगमेश्वरातील वास्तव्याबद्दल औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान याला माहिती दिली आणि संभाजी महाराज बेसावध असताना पकडले गेले. औरंगजेबाने त्यांना मरणयातना दिल्या पण त्यातही महाराज झुकले नाहीत. वयाच्या ३२ व्या वर्षी त्यांना हौतात्म्य पत्कराव लागलं. स्वराज्य संपलं असं औरंगजेबाला वाटत असताना त्याला पुढे कित्येक वर्ष लढा द्यावा लागला आणि शेवटी याच मातीत त्याला मरावं लागलं.
छावा पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्यावर प्रकाश टाकलेला आहे तर रणझुंजार या कादंबरीत महाराज्यांच्या विविध लढायांबद्दल विस्तृत माहिती दिली आहे. संघर्षमय आयुष्य काय असतं याचा प्रत्यय छत्रपती संभाजी महाराजांची कोणतीही कादंबरी वाचल्यावर येतो.
- सुबोध अनंत मेस्त्री
Comments
Post a Comment