Skip to main content

Posts

Showing posts from September, 2021

टेक्नियम

  तुम्हाला तुमचे कपडे इस्त्री करावे लागणार नाहीत किंवा मुळात तुमचे कपडे कधी खराबच होणार नाहीत.  त्यावर कोणतेही डाग पडणार नाहीत.  इस्त्री जर का फिरलीच तर तुमच्या कपड्यांचा रंग बदलण्यासाठी फिरेल.  म्हणजे एकच शर्ट तुम्ही वेगवेगळ्या रंगामध्ये वापरू शकाल.  नॅनोटेक्नॉलॉजी बद्दल अच्युत गोडबोलेजींच्या "नॅनोदय" पुस्तकात असं बरंच काही वाचलं होतं.  त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आता मार्केटमध्ये येऊ घातल्या आहेत.  जेव्हा एखाद्या सुपरफिशिअल सिनेमामध्ये पाहिलेल्या गोष्टी अशा पुस्तकात वाचायला मिळतात आणि ते खरं होऊ शकत हे पटवून देतात तेव्हा एक वेगळीच मजा असते.  असं काहीतरी वेगळं वाचायला मिळेल या अनुषंगाने अजाने दिलेलं निळू दामले यांचं "टेक्नियम" हे पुस्तक वाचायला घेतलं.  त्यात टेकनॉलॉजीचा तसा मागोवा सुरुवातीपासून दिसला नाही.  अख्ख पुस्तक टीव्हीबद्दल च्या सर्वेवरच मांडलेलं होतं.  म्हणायला तसा हिरमोड तर झाला नाही कारण हा प्रवास बघणार्यांपैकी मीसुद्धा एकच.  पण हाच प्रवास भारतातील वेगवेगळ्या खेडेगावात जाऊन त्यांनी १९९८ आणि २००८ साली केला आणि त्याचं उत्तम वर्णन या पुस्तकातुन मांडलं आहे.   प

हॅप्पी बर्थडे मनोज सर!

  प्रिय मनोज सर, असं म्हणतात कि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी नियतीने आधीच लिहून ठेवलेल्या असतात.  योग्य माणसं योग्य वेळी तुमच्या आयुष्यात येतात.  काही जण तात्पुरते येऊन जातात तर काही तुमच्या आयुष्याचा भाग होऊन जातात.   काही जणांशी नातं जुळायला महिने वर्ष निघून जातात आणि काहीजण एका भेटीतच आपले होऊन जातात. ३ वर्षांपूर्वी आपली भेटसुद्धा एम.बी.सी. च्या मीटिंगमध्ये तशीच झाली आणि आपलं नातं बहरत गेलं.  एम.बी.सी. मध्ये आल्या दिवसापासून तुमची देण्याची वृत्ती आणि इतरांच्या आयुष्यात योगदान करण्याची तळमळ दिसून आली.  रिलायन्समधून जी.एम. पोस्टवरून स्वतः राजीनामा देऊन तुम्ही बिजनेस चालू केलाय हे समजलं तेव्हा थोडाफार अँटीट्युड असावा असा अंदाज मी बांधला होता कारण कोर्पोरेटमध्ये एवढ्या पुढे गेलेल्या लोकांची स्वतःची एक स्पेस असते.  पण तुम्ही वेगळे होतात.  आपल्या एम.बी.सी. कुटुंबात सहभागी झाल्यापासून तुम्हाला कोणतं काम लहान मोठं वाटलं नाही.  इव्हेन्ट मध्ये बॅनर लावण्यापासून तुम्ही सगळी कामं आवडीने केलीत.  ना कोणत्या गोष्टीचा दिखावा ना अतिशयोक्ती.  तुम्ही आहात तसेच राहिलात म्हणून सगळ्यांना आपले

लॉस्ट कनेक्शन्स

"हॅलो, कशा आहात बाई?", नुकत्याच आलेल्या चौधरी बाईंच्या मिसकॉलवर मी रिटर्न कॉल केला होता.  बाई म्हणजे माझ्या सातवीच्या वर्गशिक्षिका.  माझ्या सगळ्यात आवडत्या.  एकदमच.  आमच्या वेळी टीचर आणि मॅडमच फॅड आमच्या शाळेत नव्हतं आणि अजूनही सगळ्या शाळेतल्या शिक्षिकांना आम्ही बाई म्हणूनच बोलवतो.  कॉलेजपासून मॅडम सुरू झालं.  पण बाई शब्दातला आपलेपणा मॅडम मध्ये नाही.  बाई बोलताना कायम "आई" बोलतोय असं वाटायचं. "मी, बरी आहे बेटा! तू आहेस कुठे? मी किती वेळा फोन केला.  तू माझा फोन उचलत नाहीस.  अगोदर अधून मधून फोन करत होतास.  मी प्रविणला (आमचे मेस्त्री सर) फोन केला होता.  त्याला पण सांगितलं, माझा सुबोध मला असा कसा विसरला?  मी फोन करून कंटाळले बाबा.  आता त्या भगवंतांचीच इच्छा असेल म्हणून फोन लागला बघ इतक्या दिवसांनी.",  राग प्रेम सगळं त्यांनी एकदाच व्यक्त केलं. बाईंचा फोन आला हे मला आठवत नव्हतं पण हेसुद्धा खरं होतं की मी त्यांना समोरून गेल्या वर्षभरात फोन केला नव्हता.  पूर्वी अधूनमधून त्यांना माझा सतत फोन असायचा.  आई गेली त्या काळात बरेच फोन माझ्याकडून मिस झाले असतील.  त्यात बाई