Skip to main content

जगून घ्या



माझा हा लेख त्या मित्रांसाठी आहे जे आज धावण्याच्या गडबडीत जगणं विसरले आहेत. आवर्जून वाचा.
===================================
2 दिवसापूर्वीच एक विचित्र घटना कानावर पडली आणि मन सुन्न झालं. दादाचा खास मित्र विजय याचा अपघाती मृत्यू झाला. त्याची बायको हि त्याची शाळेपासूनची प्रेयसी म्हणजेच 20 अधिक वर्षाची दोघांची ओळख आणि लग्नानंतर यांना एक पाच वर्षाची मुलगी त्रिशा. दादा मला त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगत होता. दादा आणि विजयने सोसायटीमध्ये एकत्र बरेच सण एकत्र साजरे केले होते आणि त्यामुळे त्यांची यारी जबरदस्त जमली होती. प्रत्येक पार्टीची जान होता विजय. दादाने त्याला कधी नाराज पहिलाच नव्हता. तो फक्त नाराज असायचा त्याची मुलगी आजारी असताना. त्याचा त्रिशा वर खूप जीव आणि तिलाही सारखा बाबाच लागायचा. त्रिशा आजारी असताना तो दादाला नाराजीने सांगायचा, "त्रिशा आजारी आहे रे. ती जेवत नसेल ना तर मलाही जेवण जात नाही. हि लहान पोर खेळता खेळता शांत झाली कि कशात मन लागत नाही.". गटारी एन्जॉय करायची म्हणून विजयच्या सगळ्या मित्रांनी रेसॉर्ट वर पिकनिक प्लॅन केला.
पिकनिकला निघताना तो आईची मस्करी करत होता. त्याने आईला सांगितलं कि, "पार्टीमध्ये मी खूप दंगा करणार, भरपूर नाचणार, मजा करणार". पण कोण जाणे का? त्या दिवशी त्याने जाऊ नये असं सारखं तीला वाटत होतं. तो तस करणार असेल तर बोलणार नाही अशीही अट तिने घातली होती. घरातून निघताना त्याने आईला खूप वेळा जातो सांगितलं, जवळ घेतलं पण आई त्याच्याकडे मुद्दाम बघत नव्हती. तो अगदी निघेपर्यंत तिला बाय करत होता पण आईने लक्ष दिल नाही. हा निरोप शेवटचा असेल याची कल्पना तिला तरी कुठे होती. तो निघून गेला तो कायमचाच. त्रिशा मात्र सोसायटीमधल्या तिच्या लहान मित्रांना सांगते कि, "माझा पप्पा मेला". विजय मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावर असल्याने तो नेहमी दोन महिन्यातून एक फॉरेन टूर करायचा आणि काही दिवस बाहेर असायचा. तिला तसाच काहीसा प्रकार वाटला असेल. तिलाही या शब्दाची कल्पना नसावी कि तिचा पप्पा पुनः कधी फिरून येणार नाही. गेल्या वर्षभरात बऱ्याच मित्रांबद्दल माझ्या कानावर अशा गोष्टी आल्या आहेत. काही अपघातात गेले, काही अटॅकने. पण होते सगळे जवळपास माझ्याच वयाचे. आणि त्यात आता हि महाडची पूल वाहून गेल्याची दुर्घटना. माणसाचं आयुष्य किती अनिश्चित आहे. हे सगळ ऐकत असताना हॅपी जर्नी या मराठी चित्रपटातला एक डायलॉग मला आठवत होता, "आपल्या आजूबाजूला असणारी, आपली वाटणारी माणस अशी अचानक गायब होतात. कुठेतरी लांब निघून जातात आणि पुन्हा परत कधीच येत नाहीत. ती गेल्यावर कळतं कि याच्याबरोबर खूप चांगले क्षण जगायचे राहून गेले". आज आपल्याबरोबर असणारी व्यक्ति उदया आपल्याबरोबर असेल हे कुणाला माहीत आहे? बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टीतून आपण त्यांना दुखवतो, वाईट बोलून जातो, प्रेमाने जवळ करत नाही किंवा त्यांचं आपल्या आयुष्यातलं महत्व त्यांना स्वतः कधी सांगत नाही. आपला गर्व किंवा "मीच का?" हा स्वभाव आपल्याला आडवा येत असतो. पण बऱ्याच वेळेला हे बोलणं कायमच राहून जात. म्हणून जे तुमच्या आयुष्यात महत्वाचे आहेत, आई, बाबा, भाऊ, बहीण, नातेवाईक, मित्र, मैत्रिणी त्यांना आजच सांगा कि त्यांच्यावर तुमचं किती प्रेम आहे. तुमचे एकत्र घालवलेले क्षण त्यांच्याबरोबर शेअर करा. जुन्या आठवणी खोदून काढा. त्यांच्या चेहऱ्यावर हसू येऊ द्या. त्या हास्याच कारण तुम्ही बना. त्यांचं ऐका. त्यांच्यावर मनसोक्त निःस्वार्थी प्रेम करा. कारण कोणती भेट शेवटची असेल हे फक्त नियतीलाच माहित.
दुसरी गोष्ट आवर्जून या घटनेतून लक्षात आली आणि जी मला मित्रांबरोबर शेअर करावीशी वाटली. काही लोक जगायचं विसरून गेले आहेत. फक्त जॉब करणं, शनिवार रविवार सुट्टी मग त्यात एखादी फॅमिली पिकनिक करायची किंवा आराम करायचा हाच एक मशीन पद्धतीने शेड्यूल ठरलेला असतो. त्यांनी हि आयुष्य जगण्याची व्याख्याच बनवून टाकली आहे. ऑफिसच पॉलिटिक्स आणि संसार हे त्यांचे दोन चघळण्याचे विषय. भविष्यासाठी खूप सारा पैसा कमावणं हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अख्ख तारुण्य यांनी पणाला लावलेलं आहे. हेच मित्र मला विचारतात, "तू एवढ्या सगळ्या गोष्टी कशा करतो रे? तू बिजनेस पण करतो, सोशल ऍक्टिव्हिटी पण करतो, मोठे इव्हेंट करतो, त्यात नाटकात पण काम करतो, खेळायला जातो, फिरायला जातो, ट्रैनिंग घेतो आणि ट्रैनिंग देतो पण. क्लासमध्ये शिकवतो. वाचतो, लिहितो. कधी मध्येच ब्लेझर घालून मोठ्या लोकांबरोबर फोटो तर कधी मित्राबरोबरचे फोटो. तू वेळ मॅनेज कसा करतो?" बऱ्याच वेळेला हा प्रश्न 'माझा एकाच गोष्टीवर कल नाही' अशा प्रकारच्या टोमण्याच्या सुरात असतो. माझं या प्रश्नावर एक सोप उत्तर तयार असत, "मी जगतो फक्त. मी उद्या असेन कि नसेन हे मला माहित नाही, पण जेव्हा डोळे मिटेन तेव्हा या जगण्याच्या धावपळीत एखादी गोष्ट करायची राहून गेली अशी फिलिंग माझ्या मनात नसेल एवढी काळजी घेतो". बऱ्याच वेळेला हे उत्तर टिंगल टवाळी मध्ये घेतलं जात. पण जो भूतकाळात अडकलेला आहे आणि भविष्यात काय होणार याच्या चिंतेत गुरफटला आहे तो वर्तमानात काय जगणार अस समजून मी दुर्लक्ष करतो. शेवटी प्रत्येकाची आयुष्याची व्याख्या ठरलेलीच आहे. पर जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नही. शेवटी एका गाण्यातही सांगितलंच आहे, "हर पल यहा जी भर जियो, जो है समा कल हो ना हो"

- सुबोध अनंत मेस्त्री
9221250656


#sahajsaral

Comments

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी