आपल्या आयुष्यात लाईफ पार्टनरचा रोल महत्वाचा असतो आणि जर उद्योग असेल तर बिजनेस पार्टनरचा...आणि त्यात पार्टनरशी कनेक्शन स्ट्रॉंग असेल तर सोने पे सुहागा. चांगल्या माणसांच्या बाबतीत नशीब घेऊनच मी जन्म घेतला असल्यामुळे लहानपणापासूनच बरीच चांगली जीवाला जीव देणारी माणसं जोडली गेली...त्यातलाच एक...आमचा सॅंड्या.
शाळेत एकत्र असल्यामुळे घरचेच संबंध. शाळेत लाजरा बुजरा, मोजकच बोलणारा. तसा शांत पण मस्तीखोर. त्याने वेगळे कोर्सेस घेतल्यामुळे कॉलेज वयामध्ये जास्त संबंध आला नाही पण तो नेहमीच घरी येऊन जाऊन असायचा. प्रत्येकाच्या फॅमिलीशी कनेक्ट स्ट्रॉंग. शाळेतले मित्र एकत्र भेटण्याच काही न काही निमित्त असायचंच त्यामुळे भेट होत राहायची. जेव्हा रायगडावर पहिल्यांदा बिजनेसचा विषय आला तेव्हा इतर तिघांबरोबर सॅंड्या तयार झाला आणि आमचं नातं मित्रापासून पार्टनर्समध्ये बदललं. इतक्या वर्षात बिजनेसच्या चढउतरांमध्ये मी बऱ्याच वेळा खचलो असेन पण तो कायम ठाम होता. प्रत्येक वेळी मला सांभाळून घेत, माझा फ्रीडम त्याने मला एन्जॉय करून दिला. मी जे नवीन काही करत होतो त्या प्रत्येक गोष्टीला प्रोत्साहन दिलं. स्वतः बॅकएन्डला राहून तो काम करत असताना बऱ्याच वेळा स्वराज्यच क्रेडिट माझ्या नावे आलं. पण स्वराज्यच्या कामाचं मेजर श्रेय हे आमच्या सॅंड्याचच.
पुढे स्वतःला डेव्हलप करण्यासाठी एम. बी. सी. जॉईन केलं आणि त्यातही टेक्निकल कामं हातात घेऊन प्रत्येक मिटींग्सचा आधार तो बनला. मुळात देण्याची वृत्ती त्याच्याकडे लहानपणापासूनच आहे त्यामुळे मोजकं बोलत असेल तरी तो जाईल तिकडचा महत्वाचा भाग होऊन जातो. बोलण्यापेक्षा कृतीतून प्रेम, आपुलकी दिसते असं म्हणतात. त्याला काही न काही निमित्ताने पाहुणचार करण्याची संधी आम्ही कायम दिली आणि त्यातच तो कायम माणूस म्हणून उलगडत गेला. आम्ही मैत्री आणि बिजनेस कायम वेगळा ठेवला पण दोन्ही ठिकाणी गरजेनुसार भूमिका आणि निर्णय त्याने कायम विचारपूर्वक घेतले. स्वतःच दुकान चालवण असेल किंवा धंद्यासाठी सामान आणण असेल त्याला बिजनेसच बाळकडू लहानपणापासूनच मिळालं. मी किंवा अजय काही वेळा इमोशन्समध्ये वाहत जातो पण संदीपमुळेच गाडी रुळावर राहते.
सुप्रियाशी लग्न करणार समजल्यावर त्याच्यापेक्षा जास्त खुश तर मी झालो होतो. त्याला परफेक्ट लाईफ पार्टनर मिळाली होती आणि तिला सुद्धा. अगदी शाळेतल्या वयापासून असेल त्याने आम्हा मित्रांपैकी कुणालाही मदत करताना मागे पुढे पाहिलं नाही. ती आर्थिक मदत असेल किंवा कोणत्याही प्रकारची. ज्या मार्गाने तो स्वतःमध्ये आता बदल घडवण्याचा प्रयत्न करतोय त्यात माणूस म्हणून तो अधिक खुलत जाईल पण त्याच्यातली माणुसकी कमी होणार नाही.
काही गोष्टी बोलण्यातून तितक्या प्रभावीपणे येत नाहीत. म्हणून वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या फिलिग्स आमच्या सॅंड्यासाठी या पोस्ट मधून मांडल्या आहेत. माझ्या आयुष्यात एक चांगला मित्र आणि बिजनेस पार्टनर म्हणून संदीपच स्थान अढळ आहे आणि ते कायम राहील. माझ्या उभा राहण्यामागे बॅकबोन म्हणून संदीपचा मोठा हातभार आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा! लव्ह यु मनापासून...आपला प्रवास शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र 

Comments
Post a Comment