Skip to main content

मयाच्या वाढदिवसानिमित्त

 



2009 साली पी. बी. सी. निमित्त आपली पहिली भेट झाली. दोघांचं राहण्याचं ठिकाण कामोठेच त्यामुळे ओळख आणि मैत्री वाढत गेली. प्रत्येक बुधवारी मिटिंग आणि उद्योजकांसाठी काम करणारे आपण दोघे धडाडीचे कार्यकर्ते, त्यातल्या त्यात उद्योगात दोघेही नवीन त्यामुळे आपली मैत्री बहरत गेली. स्ट्रगलचा बराचसा काळ आपण एकत्र घालवला आणि मग चार चौघात उठून दिसणाऱ्या "महेश" सरांच रूपांतर "मया"मध्ये झालं.
तुझ्या नावात जरी शंकर देवाचं स्थान असेल तरी तुझं उग्र रूप मी इतक्या वर्षात पाहिलं नाही पण फायनान्स या विषयावर तू मार्केटवर नेहमी राज्य करत राहिलास. मंगेश नेहमी मस्करीत म्हणतो, " महेश जोक्स पण फायनन्सवरच मारतो. इतर कोणत्याही विषयावर बोलायला लागला तर पाचव्या मिनिटाला तो फायनान्स या विषयावर येतो", हे ऐकताना थोडं गंमतीदार वाटलं तरी मंगेश किंवा आम्हा सगळ्यांना डाऊन दी लाईन एक गोष्ट माहितेय की तू फायनान्स हा विषय कोळून प्यायला आहेस. यापेक्षा एका यशस्वी उद्योजकाच लक्षण ते काय असू शकत? कुठे किती बोलायचं आणि कुठे किती वेळ थांबायचं किंवा वेळेचा प्रॉडक्टिव्ह वापर कसा करायचा हे तुला अगदी व्यवस्थित जमतं. एकदा एम.बी.सी. मीटिंगनंतर तू एका प्रोसेसबद्द्ल तेजस सरांना पेपरवर फ्लो चार्ट ड्रॉ करून दाखवत होतास आणि मी तिथेच उभा होतो. मला ते बघून कौतुक वाटलं आणि मी सहज म्हटलं, "मी आतापर्यंत हा पेपर रंगवला असता एवढी खाडाखोड केली असती", तेव्हा तेजस सर म्हणाले, " त्यासाठी थॉट्स मध्ये स्पष्टपणा लागतो जो महेश कडे चांगला आहे". आणि हे अगदी खरं आहे. मला तुझ्या विजनबद्द्ल किंवा थॉट प्रोसेसबद्दल कायम कुतूहल वाटत राहिलं आहे. अजूनही आहे.
आपल्या आजूबाजूंच्या लोकांचा कायम ग्रोथ होत राहावा ही तुझी मानसिकता जवळून पाहत राहिलो आहे. माझ्या बाबतीत मी टेकनॉलॉजी बाबतीत काय नवीन करू शकतो याबद्दल तुला मार्केटमधुन जेव्हा काही नवीन कळतं तेव्हा तू लगेच ते मला शेअर करत राहतोस. टेक आय टी ईजीअर बरेच वर्ष करण्याची ईच्छा होती पण नेमकं काय करावं कळत नव्हतं. पण तुला ही गॅप लगेच समजली आणि एक ट्रेनींग आपण सोबत अटेंड असती. मला तू ट्रैनिंग प्रोग्राम डिजाईन करण्यात मदत केलीस. कदाचित त्याशिवाय मी टेकनॉलॉजी ट्रैनिंग मध्ये लगेच पाय टाकला नसता. माझ्यासोबत अजा असेल किंवा विनोद दादा असेल तू तुझ्या सर्कल मधल्या प्रत्येक व्यक्तीबाबत फक्त योगदानाची भावना ठेवतोस. तुझ्या आजूबाजूचा प्रत्येकजण वैयक्तीक आयुष्यात कसा मोठा होईल हाच तुझा कायम प्रयत्न राहिला आहे.
कोलॅबरेशन आणि काँट्रीब्यूशन या दोन तत्वांवर तू आयुष्य जगत आलास आणि ती तुझी ताकद आहे. चुकीच्या गोष्टींना स्पष्ट चुकीची दाखवणे आणि त्याबाबतीत वेळोवेळी योग्य तो स्टॅण्ड घेणे हे तुझ्या इतकं चांगलं कुणाला जमतं असं मला वाटत नाही. इतके चॅलेंजस फेस करत असताना नेहमी सकारात्मक राहणं व चेहऱ्यावर स्माईल ठेवणं तुझ्याकडून शिकावं. प्रत्येकाच्याच आयुष्यात तुझ्यासारखा एक मित्र असावा. आम्ही त्या बाबतीत भाग्यवान आहोत. मित्राच्या पलीकडे आता आपलं भावाचं नात आहे आणि तेच कायम राहिल. बरीच वर्ष लिहायचं होत पण राहून गेलं. आज मुहूर्त लागला तुझ्या बाबतीतल्या भावना उतरवण्यासाठी. तुला भरपूर आयुष्य मिळो, तुझ्या प्रगतीचा आलेख असाच चढता राहो आणि तुझ्या हातून अगणित लोकांचं कल्याण होत राहो.
वाढदिवसाच्या भरघोस शुभेच्छा भावा!
लव्ह यु!
- सुब्या


Comments

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

आयत्या बिळात नागोबा!!!

=======================================================================  हा छोटासा लेख मला आलेल्या बँक फ्रॉड कॉल्सपैकी एक अनुभव आहे.  नक्की वाचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. =======================================================================  कालच मला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि समोरची व्यक्ती ती बँकेतून बोलत आहे अशी मला भासवत होती.  माझा आधार कार्ड बँकेला लिंक नसल्याने माझं  ATM कार्ड ब्लॉक झालं आहे असे थातूर मातूर कारण सांगून त्या व्यक्तीने माझ्याकडून बँकेच्या कार्ड आणि पिन बद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला.  मीही मला काहीच समजत नाही आणि कार्ड ब्लॉक झाल्यामुळे घाबरलो आहे असं दाखवून त्याला सगळी खोटी माहिती दिली.  नंतर त्याने बँकेची माहिती अपडेट होण्यासाठी तुम्हाला तासभर मोबाईल बंद ठेवावा लागेल असं सांगून फोन ठेवून दिला.  माझी ती खोटी माहिती वापरताना चूकीची आहे समजल्यावर त्याने मला शिव्या जरूर घातल्या असतील पण हे सामान्य माणसाला कसे फसवतात व काय सांगतात हे मला जाणून घ्यायचे होते.  ही केस तुमच्याबरोबर सुद्धा होऊ शकते.  आपण फेसबुक, ट्विटर अशा बऱ्याच ठिकाणी आपल

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी