Skip to main content

टेक्नियम

 


तुम्हाला तुमचे कपडे इस्त्री करावे लागणार नाहीत किंवा मुळात तुमचे कपडे कधी खराबच होणार नाहीत.  त्यावर कोणतेही डाग पडणार नाहीत.  इस्त्री जर का फिरलीच तर तुमच्या कपड्यांचा रंग बदलण्यासाठी फिरेल.  म्हणजे एकच शर्ट तुम्ही वेगवेगळ्या रंगामध्ये वापरू शकाल.  नॅनोटेक्नॉलॉजी बद्दल अच्युत गोडबोलेजींच्या "नॅनोदय" पुस्तकात असं बरंच काही वाचलं होतं.  त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आता मार्केटमध्ये येऊ घातल्या आहेत.  जेव्हा एखाद्या सुपरफिशिअल सिनेमामध्ये पाहिलेल्या गोष्टी अशा पुस्तकात वाचायला मिळतात आणि ते खरं होऊ शकत हे पटवून देतात तेव्हा एक वेगळीच मजा असते. 

असं काहीतरी वेगळं वाचायला मिळेल या अनुषंगाने अजाने दिलेलं निळू दामले यांचं "टेक्नियम" हे पुस्तक वाचायला घेतलं.  त्यात टेकनॉलॉजीचा तसा मागोवा सुरुवातीपासून दिसला नाही.  अख्ख पुस्तक टीव्हीबद्दल च्या सर्वेवरच मांडलेलं होतं.  म्हणायला तसा हिरमोड तर झाला नाही कारण हा प्रवास बघणार्यांपैकी मीसुद्धा एकच.  पण हाच प्रवास भारतातील वेगवेगळ्या खेडेगावात जाऊन त्यांनी १९९८ आणि २००८ साली केला आणि त्याचं उत्तम वर्णन या पुस्तकातुन मांडलं आहे.  

पूर्वीच्या काळी टी.व्ही. म्हणजे श्रीमंताचं लक्षण पण तो हळूहळू पाहूणा म्हणून खेड्याखेड्यात शहरात प्रत्येक घरात घुसला आणि प्रत्येक घराचा सदस्य होऊन बसला.  ज्या घरात पूर्वी मातीने अंघोळ केली जायची ती जागा हळूहळू साबणाने घेतली.  टीव्हीवरील जाहिराती बघून शॅम्पू घरात यायला लागले.  कंपन्यांनी खेडेगावातील वाढतं मार्केट लक्षात घेऊन सॅचेट फॉरमॅट मध्ये गोष्टी विकायला सुरुवात केली आणि ते सामान्य माणसांच्या बजेट मध्ये आल्यामुळे त्यांचा खप प्रचंड वाढला.  हळूहळू डेली सोप्स टीव्हीवर सुरु झाले आणि मग त्यात नटनट्यांनी वापरलेले कपडे, त्यांची हेअरस्टाइल, त्यांचे दागिने या प्रत्येक गोष्टीचा ट्रेंड सुरु झाला.  दुकानांमध्ये फेमस सिरियल्सच्या नटनट्यांचे कपडे, चपला दागिने येऊ लागले.  दुकानात जाऊन फक्त अमुक अमुक सिरियलच्या या पात्राचे कपडे पाहिजे सांगितलं कि ते हव्या त्या साईझ मध्ये मिळायला लागले.  ब्युटी पार्लर्स गल्लोगल्ली चालू झाली आणि त्यांचीही चालती चालू झाली.  माणूस एकमेकांना बघून तसं वागण्याचा प्रयत्न करतो.  पूर्वी गावागावातल्याच सीमा असल्याने आणि प्रवास तितका सोपा नसल्याने माणसं आपल्या समाजाप्रमाणे किंवा आजूबाजूंच्या लोकांप्रमाणे वावरत होती.  पण टीव्हीने जग घरामध्ये आणून ठेवलं.  आणि खेडीपाडी मॉडर्न व्हायला सुरुवात झाली.  ज्यांच्या घरी जेवणाची आबाळ असेल पण घरात शॅम्पू सॅचेट नक्की असणार असा किस्साही त्यांनी यात मांडला आहे.  

टीव्हीमुळे समाज बिघडतोय किंवा टीव्हीमुळे नको त्या गोष्टी घरातल्या सगळ्यांसमोर येतात वैगेरे अशी बरीच आरडाओरड सुरुवातीला झाली आणि हीच आरडाओरड गेल्या काही वर्षांपासून मोबाईलच्या बाबतीतही आहेच.  प्रत्येक नव्या गोष्टीच्या आहारी आपण जातो.  एखाद्या नव्या गोष्टीवर प्रचंड शंका कुशंका काढायच्या व नंतर बाकीचे वापरत आहेत म्हणून हळूहळू स्वतः वापरायला सुरुवात करायची ही जुनी भारतीयांची सवय. त्यामुळे तंत्रज्ञानातल्या नवनवीन गोष्टींचे  इनोव्हेशन बऱ्यापैकी बाहेरच्या देशातच झाले आहेत.  त्यामुळे आपल्या देशाला फक्त कन्ज्युमर मार्केट म्हणूनच पाहिलं जात.  हे त्यांचं मत काही अंशी पटलं. टीव्हीमध्ये आता नावीन्य राहिल नाही.  पण टीव्ही आणि मोबाईलला इंटरनेट जोडलं गेलं आणि पुन्हा एकदा जग आपल्या बोटांशी आलं.  ओ. टी. टी. किंवा टिकटॉक रिल्स सारखे नवनवीन प्रयोग आता व्हायला लागले आहेत.  त्यामुळे बऱ्याच अंशी माणसं सध्या मोबाईल बाबतीत व्यसनाधीन आहेतच.  पुढील काही वर्षात मोबाईल जरी नसेल तरी ती जागा दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीने नक्कीच घेतली असेल.  

पुस्तकाच्या शेवटी त्यांनी जे मांडलं होतं ते भन्नाटच.  नॅनोटेक्नॉलॉजीबद्दल बरेच आर्टिकल्स व्हिडीओज पहिले असल्याने त्याबद्दल माहिती होतीच.  पण मेडिकल क्षेत्रात नॅनोटेकनॉलॉजीमुळे होणारेबदल विचार करायला लावण्याजोगे होते.  जसं की, त्यांनी नॅनोबॉट्स बद्दल एक माहिती सांगितली.  नॅनोबॉट्स म्हणजे सुईच्या टोकावर हजारोंच्या संख्येने मावतील असे सूक्ष्म रोबोट्स.  हे रोबोट्स माणसाच्या शरीरामध्ये सोडले की ते पूर्ण सेक्युरिटीचं आणि डॉक्टरांचं काम करतील.  जसं कि, हृदयाच्या झडपेमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते स्वतः दुरुस्त करतील किंवा नजीकच्या हॉस्पिटल्सही संपर्क साधून योग्य ती प्रक्रिया लगेच अजमावून पाहतील.  कॅन्सरच्या पेशी तयार होण्याआधीच हे बॉट्स त्यांना संपवून टाकतील.  शरीरात कुठेही काही गडबड दिसली की हे नॅनोबॉट्स त्याची काळजी आधीच घेतील त्यामुळे माणसाचं आयुर्मान वाढू शकतं.  २१व्या शतकाच्या शेवटाला माणसाचं आयुर्मान २५०-५०० वर्ष सुद्धा होऊ शकेल.  हा सगळा निसर्गाशी खेळ नक्कीच आहे.  याचे परिणाम-दुष्परिणाम हि नंतरची गोष्ट.  पण असं काहीतरी होऊ शकतं हेच कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे.  काही गोष्टी अगदी न पटण्यासारख्या असल्या तरी तंत्रज्ञान एवढं पुढे गेलं आहे की यातली कोणतीही गोष्ट पुढील काही वर्षात अशक्य नाही. 

शेवटी, "तंत्रज्ञान श्राप कि वरदान" हे त्याचा आपण कसा वापर करू यावर अवलंबून आहे. 

- सुबोध अनंत मेस्त्री
 

Comments

Popular posts from this blog

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...

पुंडलिक सदाशिव लोकरे

  ऑक्टोबर २००९ मधली आमची पहिली भेट. बिजनेस नेटवर्किंगची माझ्या आयुष्यातली पहिली मिटिंग. मी हिमतीने एका अमिताभसारख्या उंची असणाऱ्या आणि तसाच धीरगंभीर आवाज असणाऱ्या पुंडलिकशी संवाद साधला. पण तो पहिल्या भेटीत काही मला रुचला नाही. पुढे मिटींग्सच्या निमित्ताने वरवर भेट होत राहिली. पण एकदा त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्याशी बराच वेळ संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यात हा फणसारखा माणूस मला उमगला. बाहेरून काटेरी जरी भासवत असेल (तो भासवतो पण तसा नाही तो) तरी आतून इतका गोड की त्याच्यासारखा माणूस मला आजतागायत सापडला नाही. आयुष्यातले बरेच चढउतार पाहिल्यावर अगदी स्पष्टवक्तेपणा आणि कणखरपणा आलेला पुंडलिक मला कधी कुणाची उगाच स्तुती आणि त्यावरूनही निंदानालस्ती करताना आढळला नाही. जे आहे ते त्या त्या व्यक्तीच्या तोंडावर सांगून मोकळा झाला. त्यामुळे मनात एक आणि बाहेर एक अशा द्विधा मनस्थितीत मला तो कधी दिसलाच नाही. तो ज्यांना कळला ते त्याचे एकदम खास झाले आणि ज्यांना नाही ते त्याच्या वाटेला थांबलेच नाहीत. तो मला भावला आणि माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. पुंडलिक सर ते पुंडलिक हा प्रवास काही दिवसा...

येताव

  सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघ यांच्या सौजन्याने "येताव" या आपल्या ऍपला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली. गेल्या काही वर्षात नावाजलेले व बऱ्याच न्यूज चॅनेलने / न्यूज पेपरने कव्हर केलेले पण या ना त्या कारणाने येताव ठप्प झाले होते. स्वामींच्या मठात आनंद दादाने याबाबतीत स्वामींना मनापासून आवर्तने केली होती. त्याची हाक स्वामींपर्यंत पोहचली. काही दिवसांपूर्वी नितीन वाळके सरांचा फोन आला की "मालवणात रिक्षा स्टैंड वर उभ्या असतात तर प्रवासी त्यांच्यापर्यंत आपल्या येताव ऍपद्वारे पोहचू शकतील का?". हा प्रश्न मालवणमधील रिक्षा चालक संदीप गावकर भाऊ यांनी नितीन सरांकडे मांडला होता. इथून या संकल्पनेवर नितीन सरांच्या मदतीने काम चालू झाले आणि ते प्रत्यक्षात उतरले देखील. हे ऍप रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यासाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा मानस होता. प्रोसेस तशी सोपी होती, रिक्षा वाले ज्या स्टँडवर आहेत ते लोकेशन त्यांनी ऍपवर सेट करावे आणि पॅसेंजर ने त्या लोकेशनला सर्च केले तर त्यांना तिथे उपलब्ध असलेले रिक्षाचालक दिसावेत आणि त्यानी रिक्षाचा...