Skip to main content

टेक्नियम

 


तुम्हाला तुमचे कपडे इस्त्री करावे लागणार नाहीत किंवा मुळात तुमचे कपडे कधी खराबच होणार नाहीत.  त्यावर कोणतेही डाग पडणार नाहीत.  इस्त्री जर का फिरलीच तर तुमच्या कपड्यांचा रंग बदलण्यासाठी फिरेल.  म्हणजे एकच शर्ट तुम्ही वेगवेगळ्या रंगामध्ये वापरू शकाल.  नॅनोटेक्नॉलॉजी बद्दल अच्युत गोडबोलेजींच्या "नॅनोदय" पुस्तकात असं बरंच काही वाचलं होतं.  त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आता मार्केटमध्ये येऊ घातल्या आहेत.  जेव्हा एखाद्या सुपरफिशिअल सिनेमामध्ये पाहिलेल्या गोष्टी अशा पुस्तकात वाचायला मिळतात आणि ते खरं होऊ शकत हे पटवून देतात तेव्हा एक वेगळीच मजा असते. 

असं काहीतरी वेगळं वाचायला मिळेल या अनुषंगाने अजाने दिलेलं निळू दामले यांचं "टेक्नियम" हे पुस्तक वाचायला घेतलं.  त्यात टेकनॉलॉजीचा तसा मागोवा सुरुवातीपासून दिसला नाही.  अख्ख पुस्तक टीव्हीबद्दल च्या सर्वेवरच मांडलेलं होतं.  म्हणायला तसा हिरमोड तर झाला नाही कारण हा प्रवास बघणार्यांपैकी मीसुद्धा एकच.  पण हाच प्रवास भारतातील वेगवेगळ्या खेडेगावात जाऊन त्यांनी १९९८ आणि २००८ साली केला आणि त्याचं उत्तम वर्णन या पुस्तकातुन मांडलं आहे.  

पूर्वीच्या काळी टी.व्ही. म्हणजे श्रीमंताचं लक्षण पण तो हळूहळू पाहूणा म्हणून खेड्याखेड्यात शहरात प्रत्येक घरात घुसला आणि प्रत्येक घराचा सदस्य होऊन बसला.  ज्या घरात पूर्वी मातीने अंघोळ केली जायची ती जागा हळूहळू साबणाने घेतली.  टीव्हीवरील जाहिराती बघून शॅम्पू घरात यायला लागले.  कंपन्यांनी खेडेगावातील वाढतं मार्केट लक्षात घेऊन सॅचेट फॉरमॅट मध्ये गोष्टी विकायला सुरुवात केली आणि ते सामान्य माणसांच्या बजेट मध्ये आल्यामुळे त्यांचा खप प्रचंड वाढला.  हळूहळू डेली सोप्स टीव्हीवर सुरु झाले आणि मग त्यात नटनट्यांनी वापरलेले कपडे, त्यांची हेअरस्टाइल, त्यांचे दागिने या प्रत्येक गोष्टीचा ट्रेंड सुरु झाला.  दुकानांमध्ये फेमस सिरियल्सच्या नटनट्यांचे कपडे, चपला दागिने येऊ लागले.  दुकानात जाऊन फक्त अमुक अमुक सिरियलच्या या पात्राचे कपडे पाहिजे सांगितलं कि ते हव्या त्या साईझ मध्ये मिळायला लागले.  ब्युटी पार्लर्स गल्लोगल्ली चालू झाली आणि त्यांचीही चालती चालू झाली.  माणूस एकमेकांना बघून तसं वागण्याचा प्रयत्न करतो.  पूर्वी गावागावातल्याच सीमा असल्याने आणि प्रवास तितका सोपा नसल्याने माणसं आपल्या समाजाप्रमाणे किंवा आजूबाजूंच्या लोकांप्रमाणे वावरत होती.  पण टीव्हीने जग घरामध्ये आणून ठेवलं.  आणि खेडीपाडी मॉडर्न व्हायला सुरुवात झाली.  ज्यांच्या घरी जेवणाची आबाळ असेल पण घरात शॅम्पू सॅचेट नक्की असणार असा किस्साही त्यांनी यात मांडला आहे.  

टीव्हीमुळे समाज बिघडतोय किंवा टीव्हीमुळे नको त्या गोष्टी घरातल्या सगळ्यांसमोर येतात वैगेरे अशी बरीच आरडाओरड सुरुवातीला झाली आणि हीच आरडाओरड गेल्या काही वर्षांपासून मोबाईलच्या बाबतीतही आहेच.  प्रत्येक नव्या गोष्टीच्या आहारी आपण जातो.  एखाद्या नव्या गोष्टीवर प्रचंड शंका कुशंका काढायच्या व नंतर बाकीचे वापरत आहेत म्हणून हळूहळू स्वतः वापरायला सुरुवात करायची ही जुनी भारतीयांची सवय. त्यामुळे तंत्रज्ञानातल्या नवनवीन गोष्टींचे  इनोव्हेशन बऱ्यापैकी बाहेरच्या देशातच झाले आहेत.  त्यामुळे आपल्या देशाला फक्त कन्ज्युमर मार्केट म्हणूनच पाहिलं जात.  हे त्यांचं मत काही अंशी पटलं. टीव्हीमध्ये आता नावीन्य राहिल नाही.  पण टीव्ही आणि मोबाईलला इंटरनेट जोडलं गेलं आणि पुन्हा एकदा जग आपल्या बोटांशी आलं.  ओ. टी. टी. किंवा टिकटॉक रिल्स सारखे नवनवीन प्रयोग आता व्हायला लागले आहेत.  त्यामुळे बऱ्याच अंशी माणसं सध्या मोबाईल बाबतीत व्यसनाधीन आहेतच.  पुढील काही वर्षात मोबाईल जरी नसेल तरी ती जागा दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीने नक्कीच घेतली असेल.  

पुस्तकाच्या शेवटी त्यांनी जे मांडलं होतं ते भन्नाटच.  नॅनोटेक्नॉलॉजीबद्दल बरेच आर्टिकल्स व्हिडीओज पहिले असल्याने त्याबद्दल माहिती होतीच.  पण मेडिकल क्षेत्रात नॅनोटेकनॉलॉजीमुळे होणारेबदल विचार करायला लावण्याजोगे होते.  जसं की, त्यांनी नॅनोबॉट्स बद्दल एक माहिती सांगितली.  नॅनोबॉट्स म्हणजे सुईच्या टोकावर हजारोंच्या संख्येने मावतील असे सूक्ष्म रोबोट्स.  हे रोबोट्स माणसाच्या शरीरामध्ये सोडले की ते पूर्ण सेक्युरिटीचं आणि डॉक्टरांचं काम करतील.  जसं कि, हृदयाच्या झडपेमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते स्वतः दुरुस्त करतील किंवा नजीकच्या हॉस्पिटल्सही संपर्क साधून योग्य ती प्रक्रिया लगेच अजमावून पाहतील.  कॅन्सरच्या पेशी तयार होण्याआधीच हे बॉट्स त्यांना संपवून टाकतील.  शरीरात कुठेही काही गडबड दिसली की हे नॅनोबॉट्स त्याची काळजी आधीच घेतील त्यामुळे माणसाचं आयुर्मान वाढू शकतं.  २१व्या शतकाच्या शेवटाला माणसाचं आयुर्मान २५०-५०० वर्ष सुद्धा होऊ शकेल.  हा सगळा निसर्गाशी खेळ नक्कीच आहे.  याचे परिणाम-दुष्परिणाम हि नंतरची गोष्ट.  पण असं काहीतरी होऊ शकतं हेच कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे.  काही गोष्टी अगदी न पटण्यासारख्या असल्या तरी तंत्रज्ञान एवढं पुढे गेलं आहे की यातली कोणतीही गोष्ट पुढील काही वर्षात अशक्य नाही. 

शेवटी, "तंत्रज्ञान श्राप कि वरदान" हे त्याचा आपण कसा वापर करू यावर अवलंबून आहे. 

- सुबोध अनंत मेस्त्री
 

Comments

Popular posts from this blog

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...

आपली संस्कृती ते प्रगती - राजेश मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रा. लि.

  काल राजेश इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. या वसईतील कामन विभागातील कंपनीला भेट देण्याचा योग आला. राजाराम फुलेजी यांना यावर्षी "महाराष्ट्र बिझनेस क्लब" प्रस्तुत "उद्योग गर्जना २०२५" मध्ये "उद्योगतारा" या सन्माननीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अडवायजारी बोर्ड मेंबर महेश चव्हाण यांच्यामुळे राजारामजींची ओळख झाली होती. महेश कडून त्यांच्या कंपनीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि ते काल प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. वेळेच्या जवळपास पाऊणतास आधी आम्ही त्यांच्या फॅक्टरीला पोहचलो. वसई स्टेशन तिथून लांब असल्यामुळे कार घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्यासोबत माझे मित्र आणि पार्टनर्स अमित देशमुख आणि अमित लाकरा होते. गेटबाहेरुनच कंपनीचा पसारा काय आहे याचा अंदाज आला. गेटपासून आतल्या भिंतीवर थोड्या थोड्या अंतरावर खूप चांगले मराठी / हिंदी असे मोटिव्हेशनल कोट्स लावले होते. आम्ही आत गेल्या गेल्या अकाउंट डिपार्टमेंट चे हेड आमच्याकडे आले आणि हात जोडून "गुड मॉर्निंग...वेलकम टू राजेश इंडिया" म्हणून आमचं स्वागत केलं. गाडी पार्किंग एरिया मध्ये पार्क करून आम...

जया अंगी मोठेपण....

  स्वतःच्या आवाजासाठी प्रसिद्ध असणाऱ्या हॅना चॅप्लिन यांच्या हाऊसफुल असणाऱ्या शो मध्ये परफॉर्मन्स करताना अचानक आवाज चिरकला आणि काही केल्या पुढील कार्यक्रम होईल याची शाश्वती नसताना विंगेत असलेल्या ५ वर्षाच्या चार्लीने तो परफॉर्मन्स आईऐवजी स्वतः करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले. हाच त्याच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स. आईचा आवाज गेल्यावर पैसे यायचे बंद झाले आणि अत्यंत दारिद्र्यामध्ये आयुष्य काढावे लागले. दारूमुळे आपल्या आईशी घटस्फोट घेतलेल्या बाबांकडूनही पैसे येणे बंद झाले. आईने शिवणकाम करुन घर चालवण्याचा केलेला प्रयत्नही तितका यशस्वी होत नव्हता आणि त्यामुळे उपाशीपोटी राहण्याची सवय चार्लीला लहानपणापासूनच लागली. या सगळ्या घटनांमुळे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने याला वर्कहाऊसमध्ये जावं लागलं. तिथे स्वतःची चूक नसताना शिक्षा भोगाव्या लागल्या. यातच आईला वेडाचा झटका आला आणि ती वेड्यांच्या इस्पितळात दाखल झाली. कोर्टाच्या आदेशामुळे वडिलांच्या राहत्या घरात सावत्र आईसोबत काही दिवस काढावे लागले. इथे काम केल्याशिवाय चार्लीला जेवण सुद्धा मिळत नव्हतं. शाळेतून घरी येऊन त्याला काम...