Skip to main content

लॉस्ट कनेक्शन्स


"हॅलो, कशा आहात बाई?", नुकत्याच आलेल्या चौधरी बाईंच्या मिसकॉलवर मी रिटर्न कॉल केला होता.  बाई म्हणजे माझ्या सातवीच्या वर्गशिक्षिका.  माझ्या सगळ्यात आवडत्या.  एकदमच.  आमच्या वेळी टीचर आणि मॅडमच फॅड आमच्या शाळेत नव्हतं आणि अजूनही सगळ्या शाळेतल्या शिक्षिकांना आम्ही बाई म्हणूनच बोलवतो.  कॉलेजपासून मॅडम सुरू झालं.  पण बाई शब्दातला आपलेपणा मॅडम मध्ये नाही.  बाई बोलताना कायम "आई" बोलतोय असं वाटायचं.

"मी, बरी आहे बेटा! तू आहेस कुठे? मी किती वेळा फोन केला.  तू माझा फोन उचलत नाहीस.  अगोदर अधून मधून फोन करत होतास.  मी प्रविणला (आमचे मेस्त्री सर) फोन केला होता.  त्याला पण सांगितलं, माझा सुबोध मला असा कसा विसरला?  मी फोन करून कंटाळले बाबा.  आता त्या भगवंतांचीच इच्छा असेल म्हणून फोन लागला बघ इतक्या दिवसांनी.",  राग प्रेम सगळं त्यांनी एकदाच व्यक्त केलं.

बाईंचा फोन आला हे मला आठवत नव्हतं पण हेसुद्धा खरं होतं की मी त्यांना समोरून गेल्या वर्षभरात फोन केला नव्हता.  पूर्वी अधूनमधून त्यांना माझा सतत फोन असायचा.  आई गेली त्या काळात बरेच फोन माझ्याकडून मिस झाले असतील.  त्यात बाईंचाही असू शकेल. बाईंना तेच कारण सांगून त्यांची समजूत घातली.  माझ्या सांत्वनासाठीच त्यांनी मला फोन केला होता.  आईची बातमी ऐकून त्यांना वाईट वाटलं होतं.  "अगोदर बिचारीने मेहनत केली आणि आता पोराबाळांकडून खायचे आणि आराम करायचे दिवस आले आणि परमेश्वराने नेलं बघ तिला", बाई माझी समजूत काढत होत्या.  त्याकाळी बाई आमच्या चाळीतल्या घरी येऊन गेल्या होत्या.  त्यावेळी त्यांना आई भेटली होती.  अधूनमधून अशीही भेट व्हायचीच.  बाईंची तब्येत हल्ली ठीक नसते.  मागे फोन करायच्या तेव्हाही त्यांनी मला ते सांगितलं होतच.  मी भेटायला येईन असं त्यांना कबुलही केलं होतं.  पण सततच्या कामांनी आणि नंतरच्या सततच्या लॉकडाऊनमूळे गोष्टी जुळून येत नव्हत्या.  आणि शेवटी राहायचं ते राहूनच गेलं.   मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो होतो त्यांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमात.  त्याला ३-४ वर्ष उलटून गेली असतील.  त्यानंतर फक्त फोनवरच बोलणं व्हायचं.

"खूप मोठा हो.  अजून बरंच काही तुला करायचं आहे.  यश तुझ्या वाटेत नक्की आहे बाळा.  तुझी मेहनत कमी पडू देऊ नको.  माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी राहतील.  सुनेची आणि नातवाची काळजी घे.  त्यांना पण खूप आशीर्वाद.  या दिवसात भेटणं शक्य होत नाही पण फोन करत राहा बेटा.  तुझ्याशी इतक्या दिवसांनी बोलून बरं वाटलं बघ.",  सतत शुभेच्छांचा वर्षाव होत राहिला.

"काळजी घ्या बाई.  मी येईन भेटायला नक्की", काही संभाषणामध्ये आपण निशब्द होऊन जातो.  माझं तसं काहीसं झालं.  फोन कट झाला.  "तुम्हाला कसा विसरेन बाई?  सातवीत घरची परिस्थिती बेताची आणि क्लास लावू शकत नाही म्हणून मी नऊमाई परीक्षा मी नापास झालो होतो तेव्हा तुम्ही हात देऊन मला अगदी मोफत सगळं शिकवून वार्षिक साठी तयार केलं होतं.  त्या वर्षी मी वर्गात सातवा आलो.  गणिताची एवढी भीती होती की मी आठवी गाठेन असं वाटत नव्हतं.  आठवीला इंग्रजी कठीण म्हणून तुम्ही माझ्या वाढदिवसाला दिलेलं इंग्रजी विषयाचं गाईड मला कामी आलं.  तुम्ही त्यावेळी माझ्या आयुष्यात केलेलं योगदान तुमच्यासाठी लहान असेल पण माझ्यासाठी प्रचंड मोठं होतं", फोन ठेवल्यावर मी स्वतःशीच विचार करायला लागलो.  नंतर बाईंशी संपर्क काही ना काही निमित्ताने होत राहिला पण गेल्या वर्ष दीड वर्षात माझ्याकडून काहीच संपर्क झाला नाही.

"कधी कधी आपण आपल्यात आणि आपल्या प्रॉब्लेम्स मध्ये एवढे हरवून जातो की आजूबाजूच्या आपल्या जगाचा आणि आपल्या माणसांचा कॉन्टॅक्ट कमी होत जातो.  सुरुवातीपासून आपल्या आयुष्यात असे कित्येक जण येऊन गेले असतील ज्यांनी आपल्या आयुष्याला स्पर्श केला, आपल्यासोबत चांगले मोमेंट्स शेअर केले, आपल्या बाबतीत कायम चांगला विचार केला.  पण हळूहळू काही ना काही निमित्ताने आपला संपर्क कमी होत गेला.  आपल्या कळत नकळत आपण त्यांच्यापासून लांब गेलो.  एक फोन करायला आणि विचारपूस करायला कितीसा वेळ लागतो?  काहींना फक्त आपलं सगळं व्यवस्थित चालू आहे हे आपल्याकडूनच कळावं अशी माफक अपेक्षा असते.", बाजूला बसलेल्या अजाला फोन ठेवल्याठेवल्या मी असं बरंच काही सांगायला लागलो आणि पुढच्याच क्षणी पुन्हा एकदा माझ्या कामात गढून गेलो.

"रिकामी घरं नेहमीच तुम्हाला हरवलेली नाती दाखवतात.  प्रेमाच्या अभावाची जाणीव करून देतात.  सत्य तर हे आहे, की नेहमीच पैसा सर्व काही नसतो. -  अज्ञात

-सुबोध अनंत मेस्त्री

Comments

Popular posts from this blog

आपली संस्कृती ते प्रगती - राजेश मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रा. लि.

  काल राजेश इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. या वसईतील कामन विभागातील कंपनीला भेट देण्याचा योग आला. राजाराम फुलेजी यांना यावर्षी "महाराष्ट्र बिझनेस क्लब" प्रस्तुत "उद्योग गर्जना २०२५" मध्ये "उद्योगतारा" या सन्माननीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अडवायजारी बोर्ड मेंबर महेश चव्हाण यांच्यामुळे राजारामजींची ओळख झाली होती. महेश कडून त्यांच्या कंपनीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि ते काल प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. वेळेच्या जवळपास पाऊणतास आधी आम्ही त्यांच्या फॅक्टरीला पोहचलो. वसई स्टेशन तिथून लांब असल्यामुळे कार घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्यासोबत माझे मित्र आणि पार्टनर्स अमित देशमुख आणि अमित लाकरा होते. गेटबाहेरुनच कंपनीचा पसारा काय आहे याचा अंदाज आला. गेटपासून आतल्या भिंतीवर थोड्या थोड्या अंतरावर खूप चांगले मराठी / हिंदी असे मोटिव्हेशनल कोट्स लावले होते. आम्ही आत गेल्या गेल्या अकाउंट डिपार्टमेंट चे हेड आमच्याकडे आले आणि हात जोडून "गुड मॉर्निंग...वेलकम टू राजेश इंडिया" म्हणून आमचं स्वागत केलं. गाडी पार्किंग एरिया मध्ये पार्क करून आम...

अडोलसन्स

  अडोलसन्स एक वेगळा विषय म्हणून बरीच चर्चा झालेली अडोलसन्स ही नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज पाहिली. अगदी मोजक्या ४ एपिसोडमध्ये विषयाचं गांभीर्य मांडण्यात दिग्दर्शक आणि टीम यशस्वी झाली आहे. एक जेमी नावाचा १३ वर्षाचा मुलगा आपल्याच वर्गातल्या मुलीचा खून करतो आणि त्याबद्दलच्या इन्वेस्टीगेशन बाबतीतच ही वेबसिरीज आहे. पहिल्या एपिसोडमध्ये अटक, दुसऱ्या एपिसोडमध्ये शाळेचं वातावरण, तिसऱ्या एपिसोडमध्ये जेमीची मानसिकता आणि चौथ्या भागात जेमीच्या कुटुंबियांना समाजाचा होणारा त्रास अशा सगळ्या अँगलना कव्हर करत ही वेबसिरीज आपल्याला विचार करायला भाग पाडते. अगोदर नाटकासारखी रिहर्सल करून सलग शूट झालेला प्रत्येक एपिसोड असल्यामुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे अजून जिवंतपणा आणि नैसर्गिकता येते. मुलं लहान असल्यापासून पालक म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणारे आपण त्यांना कायम मॉनिटर्ड ऍक्सेस देणं विसरतो आणि मुलांची प्रायव्हसी म्हणून आपण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतो. मुळात ते द्यायलाच हवं पण ते एका विशिष्ट वयानंतर. पौगंडावस्थेत असताना (खासकरून १२ ते १७ वयोगट) आपल्यासमोर अगदी सहज वावरणारी बरीच मुले इंटरनेटच्य...

जया अंगी मोठेपण....

  स्वतःच्या आवाजासाठी प्रसिद्ध असणाऱ्या हॅना चॅप्लिन यांच्या हाऊसफुल असणाऱ्या शो मध्ये परफॉर्मन्स करताना अचानक आवाज चिरकला आणि काही केल्या पुढील कार्यक्रम होईल याची शाश्वती नसताना विंगेत असलेल्या ५ वर्षाच्या चार्लीने तो परफॉर्मन्स आईऐवजी स्वतः करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले. हाच त्याच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स. आईचा आवाज गेल्यावर पैसे यायचे बंद झाले आणि अत्यंत दारिद्र्यामध्ये आयुष्य काढावे लागले. दारूमुळे आपल्या आईशी घटस्फोट घेतलेल्या बाबांकडूनही पैसे येणे बंद झाले. आईने शिवणकाम करुन घर चालवण्याचा केलेला प्रयत्नही तितका यशस्वी होत नव्हता आणि त्यामुळे उपाशीपोटी राहण्याची सवय चार्लीला लहानपणापासूनच लागली. या सगळ्या घटनांमुळे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने याला वर्कहाऊसमध्ये जावं लागलं. तिथे स्वतःची चूक नसताना शिक्षा भोगाव्या लागल्या. यातच आईला वेडाचा झटका आला आणि ती वेड्यांच्या इस्पितळात दाखल झाली. कोर्टाच्या आदेशामुळे वडिलांच्या राहत्या घरात सावत्र आईसोबत काही दिवस काढावे लागले. इथे काम केल्याशिवाय चार्लीला जेवण सुद्धा मिळत नव्हतं. शाळेतून घरी येऊन त्याला काम...