कोकणस्थ - मातीची ओढ आपल्यातल्या बऱ्याच लोकांना शहरातील धावपळीचं आयुष्य आवडत नाही. गावाकडे निवांत रहावस वाटतं. पण इथे सगळ्याच गोष्टींची पाळंमुळं अशी रोवलेली असतात की इथून सगळं बस्तान गावाला हलवू शकत नाही. पण कोकणस्थ या पुस्तकात प्रज्ञा ताईंनी गावी घर बांधून कॉंक्रिटच जंगल सोडून आपल्या मातीत राहण्याचा निर्धार केला. हे पुस्तक वाचताना प्रज्ञा ताईंच्या नजरेतून आपण कोंकणच नवं रूप पाहतोय इतके आपण या पुस्तकात गुंतून जातो. प्रत्येक प्रसंग आपण डोळ्याने पाहतोय इतक्या उत्तम शब्दात प्रज्ञा ताईंनी तो डोळ्यासमोर उभा केलाय. ताईंच्या गीताई बंगल्याचा, त्याच्या आजूबाजूच्या वाडीचा, घरामागच्या ओहोळाचा, तिथे उपस्थित माणसांचा, निसर्गाचा सगळ्याच गोष्टींचा आपण एक भाग होतो. स्वतःचा व्यवसाय सांभाळून गावाकडची ओढ त्यांनी कायम ठेवली आणि त्यामुळेच त्यांचं स्वप्न त्यांना जगता आलं. गावाकडच्या बऱ्याच विषयांना त्यांनी मार्मिक पद्धतीने हात घातला आणि एक वेगळा दृष्टिकोन वाचकांसमोर उभा करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. ...
ऑक्टोबर २००९ मधली आमची पहिली भेट. बिजनेस नेटवर्किंगची माझ्या आयुष्यातली पहिली मिटिंग. मी हिमतीने एका अमिताभसारख्या उंची असणाऱ्या आणि तसाच धीरगंभीर आवाज असणाऱ्या पुंडलिकशी संवाद साधला. पण तो पहिल्या भेटीत काही मला रुचला नाही. पुढे मिटींग्सच्या निमित्ताने वरवर भेट होत राहिली. पण एकदा त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्याशी बराच वेळ संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यात हा फणसारखा माणूस मला उमगला. बाहेरून काटेरी जरी भासवत असेल (तो भासवतो पण तसा नाही तो) तरी आतून इतका गोड की त्याच्यासारखा माणूस मला आजतागायत सापडला नाही. आयुष्यातले बरेच चढउतार पाहिल्यावर अगदी स्पष्टवक्तेपणा आणि कणखरपणा आलेला पुंडलिक मला कधी कुणाची उगाच स्तुती आणि त्यावरूनही निंदानालस्ती करताना आढळला नाही. जे आहे ते त्या त्या व्यक्तीच्या तोंडावर सांगून मोकळा झाला. त्यामुळे मनात एक आणि बाहेर एक अशा द्विधा मनस्थितीत मला तो कधी दिसलाच नाही. तो ज्यांना कळला ते त्याचे एकदम खास झाले आणि ज्यांना नाही ते त्याच्या वाटेला थांबलेच नाहीत. तो मला भावला आणि माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. पुंडलिक सर ते पुंडलिक हा प्रवास काही दिवसा...