Skip to main content

जीवात्मा जगाचे कायदे

 


"चांगली कर्म करशील तर स्वर्गात जाशील नाहीतर नरकात जाशील", अशी वाक्य सहजासहजी लहानपणापासून आपल्या कानावर पडत आली असतील. "मेल्यानंतर कुणी बघितलंय रे...जे आहे ते सगळं इकडेच", हे वाक्य सुद्धा अगदी कॉमन. पण पृथ्वीवर फक्त आपण आपल्या आत्म्याचा विकास करण्यासाठी आलोय अशा अनुषंगाने "जीवात्मा जगाचे कायदे - लॉज ऑफ द स्पिरिट वर्ल्ड" हे खोरशेद भावनगरी यांचे पुस्तक आपल्याला मार्गदर्शन करते.
खोरशेद भावनगरी यांची दोन मुले अगदी तरुण वयात मोटार अपघातात दगावली. उतार वयात हा धक्का त्यांना सहन झाला नाही. त्यांना ही घटना मान्य होत नव्हती. अशा काही व्यक्ती आहेत ज्या जीवात्मा जगाशी आपल्याला संपर्क करून देतात हे त्यांना कुणीतरी सुचवले. व त्यांच्या मदतीने खोरशेद यांनी स्वतःच्या दोन्ही मुलांच्या आत्म्याशी संपर्क सुरू केला. त्यांच्या मुलांनी मृत्यूनंतरच्या आयुष्यावर सांगितलेल्या गोष्टींवर हे पूर्ण पुस्तक आधारित आहे.
बऱ्याच गोष्टी मानन्या न मानन्यावर आहेत पण शिकण्यासारखं या पुस्तकातून बरच काही आहे. जसं की, एखाद्याला मदत केल्यावर तो विचारसुद्धा तुमच्या मनाला पुन्हा शिवला नाही पाहिजे एवढी ती निस्वार्थी मदत हवी, अहंकार कसा निर्माण होतो आणि त्याचे परिणाम आपल्या आयुष्यावर कसे होतात, कर्म आपल्या अध्यात्मिक प्रगतीवर कसे परिणाम करतात, कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करण्याचा विचारही का करू नये, अपयश का महत्त्वाचे आहे आणि यासारखं अजून बरच काही. ज्या व्यक्ती आपल्याला सोडून या जगातून निघून जातात त्या आपल्याला मार्गदर्शन करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात पण आपण भौतिक मनामध्ये इतके गुंतलो आहोत की अर्धजागृत मनाकडून ते संदेश घेण्याचा आपल्याकडून प्रयत्न होत नाही. ज्यांच्याकडे अर्धजागृत मनाला सचेतन ठेवण्याची ताकद आहे तेच त्यांच्याशी संपर्क साधू शकतात.
खरं तर या पृथ्वीवरून व्यक्ती निघून गेली तर ती या भौतिक जाळामधून पूर्णपणे मुक्त झालेली असते आणि तिच्या कर्माचा हिशोब होऊन ती नक्की १ ते ७ पैकी कोणत्या लोकामध्ये जाईल हे ठरते. खऱ्या अर्थाने आपल्याला सोडून गेलेली व्यक्ती ही आपल्यासोबत कायम असते. पृथ्वीवर आहोत तर जास्तीत जास्त लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक योगदान करून आपण आपल्या आत्म्याचा विकास करून घेतला पाहिजे हेच या पुस्तकातून मांडलं आहे.
धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री


Comments

Popular posts from this blog

अडोलसन्स

  अडोलसन्स एक वेगळा विषय म्हणून बरीच चर्चा झालेली अडोलसन्स ही नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज पाहिली. अगदी मोजक्या ४ एपिसोडमध्ये विषयाचं गांभीर्य मांडण्यात दिग्दर्शक आणि टीम यशस्वी झाली आहे. एक जेमी नावाचा १३ वर्षाचा मुलगा आपल्याच वर्गातल्या मुलीचा खून करतो आणि त्याबद्दलच्या इन्वेस्टीगेशन बाबतीतच ही वेबसिरीज आहे. पहिल्या एपिसोडमध्ये अटक, दुसऱ्या एपिसोडमध्ये शाळेचं वातावरण, तिसऱ्या एपिसोडमध्ये जेमीची मानसिकता आणि चौथ्या भागात जेमीच्या कुटुंबियांना समाजाचा होणारा त्रास अशा सगळ्या अँगलना कव्हर करत ही वेबसिरीज आपल्याला विचार करायला भाग पाडते. अगोदर नाटकासारखी रिहर्सल करून सलग शूट झालेला प्रत्येक एपिसोड असल्यामुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे अजून जिवंतपणा आणि नैसर्गिकता येते. मुलं लहान असल्यापासून पालक म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणारे आपण त्यांना कायम मॉनिटर्ड ऍक्सेस देणं विसरतो आणि मुलांची प्रायव्हसी म्हणून आपण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतो. मुळात ते द्यायलाच हवं पण ते एका विशिष्ट वयानंतर. पौगंडावस्थेत असताना (खासकरून १२ ते १७ वयोगट) आपल्यासमोर अगदी सहज वावरणारी बरीच मुले इंटरनेटच्य...

पुंडलिक सदाशिव लोकरे

  ऑक्टोबर २००९ मधली आमची पहिली भेट. बिजनेस नेटवर्किंगची माझ्या आयुष्यातली पहिली मिटिंग. मी हिमतीने एका अमिताभसारख्या उंची असणाऱ्या आणि तसाच धीरगंभीर आवाज असणाऱ्या पुंडलिकशी संवाद साधला. पण तो पहिल्या भेटीत काही मला रुचला नाही. पुढे मिटींग्सच्या निमित्ताने वरवर भेट होत राहिली. पण एकदा त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्याशी बराच वेळ संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यात हा फणसारखा माणूस मला उमगला. बाहेरून काटेरी जरी भासवत असेल (तो भासवतो पण तसा नाही तो) तरी आतून इतका गोड की त्याच्यासारखा माणूस मला आजतागायत सापडला नाही. आयुष्यातले बरेच चढउतार पाहिल्यावर अगदी स्पष्टवक्तेपणा आणि कणखरपणा आलेला पुंडलिक मला कधी कुणाची उगाच स्तुती आणि त्यावरूनही निंदानालस्ती करताना आढळला नाही. जे आहे ते त्या त्या व्यक्तीच्या तोंडावर सांगून मोकळा झाला. त्यामुळे मनात एक आणि बाहेर एक अशा द्विधा मनस्थितीत मला तो कधी दिसलाच नाही. तो ज्यांना कळला ते त्याचे एकदम खास झाले आणि ज्यांना नाही ते त्याच्या वाटेला थांबलेच नाहीत. तो मला भावला आणि माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. पुंडलिक सर ते पुंडलिक हा प्रवास काही दिवसा...

येताव

  सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघ यांच्या सौजन्याने "येताव" या आपल्या ऍपला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली. गेल्या काही वर्षात नावाजलेले व बऱ्याच न्यूज चॅनेलने / न्यूज पेपरने कव्हर केलेले पण या ना त्या कारणाने येताव ठप्प झाले होते. स्वामींच्या मठात आनंद दादाने याबाबतीत स्वामींना मनापासून आवर्तने केली होती. त्याची हाक स्वामींपर्यंत पोहचली. काही दिवसांपूर्वी नितीन वाळके सरांचा फोन आला की "मालवणात रिक्षा स्टैंड वर उभ्या असतात तर प्रवासी त्यांच्यापर्यंत आपल्या येताव ऍपद्वारे पोहचू शकतील का?". हा प्रश्न मालवणमधील रिक्षा चालक संदीप गावकर भाऊ यांनी नितीन सरांकडे मांडला होता. इथून या संकल्पनेवर नितीन सरांच्या मदतीने काम चालू झाले आणि ते प्रत्यक्षात उतरले देखील. हे ऍप रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यासाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा मानस होता. प्रोसेस तशी सोपी होती, रिक्षा वाले ज्या स्टँडवर आहेत ते लोकेशन त्यांनी ऍपवर सेट करावे आणि पॅसेंजर ने त्या लोकेशनला सर्च केले तर त्यांना तिथे उपलब्ध असलेले रिक्षाचालक दिसावेत आणि त्यानी रिक्षाचा...