Skip to main content

Posts

Showing posts from 2024

जागऱ्याचा वाढदिवस

  कॉलेजमध्ये अनेक मित्रांचा ग्रुप आणि त्यामध्ये एक मैत्रीण असते. माझ्याही ग्रुपमध्ये होती. डिग्रीच्या फर्स्ट ईयरला आमची ओळख झाली. मी स्पर्धेसाठी एकांकिका बसवत होतो आणि तेव्हा कॉमर्स स्ट्रीम मधल्या एका कलाकाराने हीचं नाव सजेस्ट केलेलं. ती एकांकिका तर मस्तच झाली पण त्या निमित्ताने मला आयुष्याभरासाठी एक चांगली मैत्रीण भेटली. त्यानंतर कितीतरी परफॉर्मन्सेस आम्ही एकत्र केले. जेव्हा तिने नाटकात काम केलं नाही तेव्हा ती खंबीरपणे बॅकस्टेजला माझ्यासोबत उभी राहिली. समोर असताना कितीही टांग खेचली असेल पण तिच्या डोळ्यात कौतुक कायम असायचं. सेकंड ईयरला मी कल्चरल सेक्रेटरी आणि ही जॉईंट कल्चरल सेक्रेटरी होती. पण माझा अभ्यास आणि इतर एक्टिव्हिटीजमुळे वेळ मिळत नसताना हिने माझीही कामे विना तक्रार केली. तेव्हा आमची मैत्री अजून खुलली. मला कुणी हिरो घेणार नाही आणि तिला कुणी हिरोईन म्हणून प्रसादने लिहिलेली गाथा माझ्या प्रेमाची आम्ही लिड रोल मध्ये सगळ्या टीम सोबत केली होती. कॉलेजच्या ऍन्यूअलचा तो परफॉर्मन्स आयुष्यभर न विसरता येण्याजोगा आहे. मी माझी सिक्रेट्स तिच्यासमोर ओपन करायला लागलो आणि तिने ग...

कुर्ला ते मॉरिशस

  “काकी तू आता रिटायरमेंट घेऊन पुस्तक लिहायला हवंस” अस कित्येक वेळा काकीशी बोलणं झालं असेल. तिची मुख्याध्यापिकेची नोकरी, तिथली जबाबदारी, तिची समाजसेवी कामे यातून तिला तशी फुरसत मिळणं कठीणच. त्यात २५-३० वर्षापूर्वी झालेलं तिचं फुफुसाचं मोठं ऑपरेशन. एवढ्या अवघड परिस्थितीतून नोकरीतल्या जबाबदाऱ्या आणि स्वतःची तब्येत सांभाळत लिखाण करणं थोडं अशक्यच होतं. पण तिचे विचार लोकांपर्यंत पोहचायला हवेत या अनुषंगाने आम्ही तिला विनंती करायचो. आणि शेवटी ते स्वप्न पूर्ण झालं. काही दिवसांपूर्वी कवितेचं पुस्तक करायचं अस काकीने बोलून दाखवलं आणि आम्ही कामाला लागलो. कोणत्या ना कोणत्या स्पर्धेच्या निमित्ताने काकीने प्रासंगिक कविता केल्या होत्या व त्यात तिला बक्षीसही मिळाली होती. सगळ्याच कविता अप्रतिम होत्या. कौतुक म्हणजे वीस एक वर्षापासूनच्या या सगळ्या कविता काकीने जपून ठेवल्या होत्या. प्रत्येक कवितेवर टाकलेल्या तारखेमुळे आम्हाला ते कळालं. पुस्तकावर काम करण्याचा उत्साह वेगळ्या लेव्हलचा होता कारण हे पुस्तक मॉरिशसला प्रकाशित होणार होतं. समीरच्या मिडाशियन टचने पुस्तकाच अप्रतिम डिजाईन झालं आणि अखेरी...

“श्रीकांत” - एक प्रेरणादायी अनुभव

  नो ऍक्शन सीक्वेंस…नो रोमांटिक सिन्स…ना मसाला…ना खूप लक्षात राहतील अशी गाणी…फक्त कंटेंट स्ट्राँग असेल तर एक अख्खा मूवी तुम्ही कुठेही विचलित न होता पाहू शकता आणि प्रचंड सकारात्मकता घेऊन थिएटर बाहेर पडू शकता….श्रीकांत पाहिल्यावर हा अनुभव आला. माणसाने जर ठरवलं तर त्याच्यासाठी कोणतंच लिमिटेशन राहत नाही…जन्मापासून आंधळा व्यक्ती आयुष्यात स्वतःच्या हिंमतीवर ठरवलं ते सगळं मिळवू शकतो…अगदी सिस्टमला चॅलेंज करून बदलण्यास भाग पाडू शकतो…सत्य घटना आहे हे माहीत नसतं तर कदाचित फक्त मूव्ही म्हणून एंजॉय केला असता पण रिअल श्रीकांत शेवटी जेव्हा स्क्रीनवर येतो तेव्हा फक्त अभिमान वाटत नाही तर एक वेगळीच ऊर्जा मिळते… आंधळा मुलगा जन्माला आला म्हणून नातेवाईकांपासून शेजारचे नुकत्याच जन्मलेल्या श्रीकांतला संपवण्यासाठी त्याच्या आई बाबांना उपदेश करतात आणि त्यावेळी ते पाप होता होता राहिलं म्हणूनच आज एक जबरदस्त प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आपल्यामध्ये राहिलं…बापाला श्रीकांतच्या भविष्याची चिंता असते म्हणूनच की काय संपूर्ण चित्रपटात सतत “पापा कहेते है बडा नाम करेगा” हे आपल्या ओळखीच ९० च्या दशकातलं गाणं वाजत राहतं आण...

जीवात्मा जगाचे कायदे

  "चांगली कर्म करशील तर स्वर्गात जाशील नाहीतर नरकात जाशील", अशी वाक्य सहजासहजी लहानपणापासून आपल्या कानावर पडत आली असतील. "मेल्यानंतर कुणी बघितलंय रे...जे आहे ते सगळं इकडेच", हे वाक्य सुद्धा अगदी कॉमन. पण पृथ्वीवर फक्त आपण आपल्या आत्म्याचा विकास करण्यासाठी आलोय अशा अनुषंगाने "जीवात्मा जगाचे कायदे - लॉज ऑफ द स्पिरिट वर्ल्ड" हे खोरशेद भावनगरी यांचे पुस्तक आपल्याला मार्गदर्शन करते. खोरशेद भावनगरी यांची दोन मुले अगदी तरुण वयात मोटार अपघातात दगावली. उतार वयात हा धक्का त्यांना सहन झाला नाही. त्यांना ही घटना मान्य होत नव्हती. अशा काही व्यक्ती आहेत ज्या जीवात्मा जगाशी आपल्याला संपर्क करून देतात हे त्यांना कुणीतरी सुचवले. व त्यांच्या मदतीने खोरशेद यांनी स्वतःच्या दोन्ही मुलांच्या आत्म्याशी संपर्क सुरू केला. त्यांच्या मुलांनी मृत्यूनंतरच्या आयुष्यावर सांगितलेल्या गोष्टींवर हे पूर्ण पुस्तक आधारित आहे. बऱ्याच गोष्टी मानन्या न मानन्यावर आहेत पण शिकण्यासारखं या पुस्तकातून बरच काही आहे. जसं की, एखाद्याला मदत केल्यावर तो विचारसुद्धा तुमच्या मनाला पुन्हा शिवला नाही...

ययाती

  बरेच दिवस या कादंबरीबद्दल ऐकून होतो. कुरू कुळातील राजा ययाती. त्याचे बाबा नहुष यांनी इंद्रावर विजय मिळवून ऋषींनाच पालखीचे भोई बनवले आणि विजयाच्या उन्मादात त्यांना लाथाडले. “नहुषाची मुलं कधीच सुखी होणार नाहीत” या एका ऋषींच्या शापाने ययाती आणि त्याचा भाऊ यति याचं आयुष्य पालटून गेलं. तस पाहिलं तर पुराणातली जादू-आश्चर्याने भरलेली एक कथा पण त्यातली पात्र आजही आपल्या आजूबाजूला दिसतात. विजयच्या उन्मादात गर्विष्ठ झालेला नहुष राजा, वासनांध आणि फक्त भौतिक सुखात समाधान शोधणारा ययाती, सूडाच्या भावनेने आयुष्य जगणारी देवयानी, कोपिष्ट शुक्राचार्य, आयुष्यच तत्वज्ञान कळलेला आणि वेळोवेळी कठीण प्रसंगात उभा राहणारा कच, पितृआज्ञेपोटी दासित्व स्वीकारणारी आणि दुसऱ्यांच्या विचाराने प्रेमाचा त्याग करणारी श्रमिष्ठा. माणसाच्या दुर्गुणांना जोपर्यंत तो जोपासत राहतो तोपर्यंत ते त्याचा छळ करीत राहतात यावर वि. स. खांडेकर म्हणतात, “वासना ही अशी गोष्ट आहे जिचा आपण जितका उपभोग घेऊ तितकी ती फोफावत राहते.” आपण स्वतः आजही आचरणात आणू शकतो अशा कितीतरी गोष्टी ययाती आपल्याला सहज शिकवून जातो फक्त आपल्याकडे तो दृष...