Skip to main content

रणझुंजार

  


रणझुंजार

स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन एखाद्या ठीपक्या एवढं साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी हजारो पटींनी त्यांच्या हयातीत वाढवलं. त्यावेळी एवढ्या बलाढ्य शाह्या फोफावलेल्या असताना स्वराज्य स्थापनेचा विचार करण हे सुद्धा धाडसाचं होत. या कार्यात त्यांना कित्येक गोष्टींचा त्याग करावा लागला. कितीतरी धाडसी प्रसंगाना समोर जावं लागलं. स्वतःची दुःख बाजूला सारावी लागली. अफजलखानच संकट स्वराज्यावर घोंगावत असताना त्यांच्या पहिल्या पत्नी सईबाई आपल्या लहान संभाजी राजांना जिजाऊंकडे सोपाऊन हे जग सोडून निघून गेल्या. त्यानंतर संभाजी महाराजांच्या आयुष्यात फक्त संघर्षच लिहिला होता.

पुत्रप्रेमाने आंधळ्या झालेल्या सोयराबाईनी सत्तेच्या हव्यासापोटी संभाजी महाराजांना संपवण्याचा प्रयत्न केला. मोगल, इंग्रज, पोर्तुगीज, हबशी यांच्यासोबत लढता लढता त्यांच्यावर स्वकियांशीसुद्धा लढण्याची वेळ येऊन ठेपली. त्यांच्या कारकिर्दीची ९ वर्ष त्यांना फक्त लढतच राहावं लागलं. त्यांनी कोणत्याही परिस्थिती हार मानली नाही आणि निकराने लढा दिला. या गोष्टीचा स्वतः औरंगजेबाला इतका त्रास झाला कि तो भलेमोठे सैन्य घेऊन स्वतः संभाजी महाराजांना संपवण्यासाठी दक्षिणेत उतरला. त्यातही महाराजांनी मोगलांना निकराचा लढा दिला व शेवटी महाराजांचे मेहुणे गणोजी शिर्के यांनी संभाजी महाराजांच्या संगमेश्वरातील वास्तव्याबद्दल औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान याला माहिती दिली आणि संभाजी महाराज बेसावध असताना पकडले गेले. औरंगजेबाने त्यांना मरणयातना दिल्या पण त्यातही महाराज झुकले नाहीत. वयाच्या ३२ व्या वर्षी त्यांना हौतात्म्य पत्कराव लागलं. स्वराज्य संपलं असं औरंगजेबाला वाटत असताना त्याला पुढे कित्येक वर्ष लढा द्यावा लागला आणि शेवटी याच मातीत त्याला मरावं लागलं.

छावा पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्यावर प्रकाश टाकलेला आहे तर रणझुंजार या कादंबरीत महाराज्यांच्या विविध लढायांबद्दल विस्तृत माहिती दिली आहे. संघर्षमय आयुष्य काय असतं याचा प्रत्यय छत्रपती संभाजी महाराजांची कोणतीही कादंबरी वाचल्यावर येतो.

- सुबोध अनंत मेस्त्री


Comments

Popular posts from this blog

अडोलसन्स

  अडोलसन्स एक वेगळा विषय म्हणून बरीच चर्चा झालेली अडोलसन्स ही नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज पाहिली. अगदी मोजक्या ४ एपिसोडमध्ये विषयाचं गांभीर्य मांडण्यात दिग्दर्शक आणि टीम यशस्वी झाली आहे. एक जेमी नावाचा १३ वर्षाचा मुलगा आपल्याच वर्गातल्या मुलीचा खून करतो आणि त्याबद्दलच्या इन्वेस्टीगेशन बाबतीतच ही वेबसिरीज आहे. पहिल्या एपिसोडमध्ये अटक, दुसऱ्या एपिसोडमध्ये शाळेचं वातावरण, तिसऱ्या एपिसोडमध्ये जेमीची मानसिकता आणि चौथ्या भागात जेमीच्या कुटुंबियांना समाजाचा होणारा त्रास अशा सगळ्या अँगलना कव्हर करत ही वेबसिरीज आपल्याला विचार करायला भाग पाडते. अगोदर नाटकासारखी रिहर्सल करून सलग शूट झालेला प्रत्येक एपिसोड असल्यामुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे अजून जिवंतपणा आणि नैसर्गिकता येते. मुलं लहान असल्यापासून पालक म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणारे आपण त्यांना कायम मॉनिटर्ड ऍक्सेस देणं विसरतो आणि मुलांची प्रायव्हसी म्हणून आपण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतो. मुळात ते द्यायलाच हवं पण ते एका विशिष्ट वयानंतर. पौगंडावस्थेत असताना (खासकरून १२ ते १७ वयोगट) आपल्यासमोर अगदी सहज वावरणारी बरीच मुले इंटरनेटच्य...

पुंडलिक सदाशिव लोकरे

  ऑक्टोबर २००९ मधली आमची पहिली भेट. बिजनेस नेटवर्किंगची माझ्या आयुष्यातली पहिली मिटिंग. मी हिमतीने एका अमिताभसारख्या उंची असणाऱ्या आणि तसाच धीरगंभीर आवाज असणाऱ्या पुंडलिकशी संवाद साधला. पण तो पहिल्या भेटीत काही मला रुचला नाही. पुढे मिटींग्सच्या निमित्ताने वरवर भेट होत राहिली. पण एकदा त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्याशी बराच वेळ संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यात हा फणसारखा माणूस मला उमगला. बाहेरून काटेरी जरी भासवत असेल (तो भासवतो पण तसा नाही तो) तरी आतून इतका गोड की त्याच्यासारखा माणूस मला आजतागायत सापडला नाही. आयुष्यातले बरेच चढउतार पाहिल्यावर अगदी स्पष्टवक्तेपणा आणि कणखरपणा आलेला पुंडलिक मला कधी कुणाची उगाच स्तुती आणि त्यावरूनही निंदानालस्ती करताना आढळला नाही. जे आहे ते त्या त्या व्यक्तीच्या तोंडावर सांगून मोकळा झाला. त्यामुळे मनात एक आणि बाहेर एक अशा द्विधा मनस्थितीत मला तो कधी दिसलाच नाही. तो ज्यांना कळला ते त्याचे एकदम खास झाले आणि ज्यांना नाही ते त्याच्या वाटेला थांबलेच नाहीत. तो मला भावला आणि माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. पुंडलिक सर ते पुंडलिक हा प्रवास काही दिवसा...

आपली संस्कृती ते प्रगती - राजेश मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रा. लि.

  काल राजेश इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. या वसईतील कामन विभागातील कंपनीला भेट देण्याचा योग आला. राजाराम फुलेजी यांना यावर्षी "महाराष्ट्र बिझनेस क्लब" प्रस्तुत "उद्योग गर्जना २०२५" मध्ये "उद्योगतारा" या सन्माननीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अडवायजारी बोर्ड मेंबर महेश चव्हाण यांच्यामुळे राजारामजींची ओळख झाली होती. महेश कडून त्यांच्या कंपनीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि ते काल प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. वेळेच्या जवळपास पाऊणतास आधी आम्ही त्यांच्या फॅक्टरीला पोहचलो. वसई स्टेशन तिथून लांब असल्यामुळे कार घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्यासोबत माझे मित्र आणि पार्टनर्स अमित देशमुख आणि अमित लाकरा होते. गेटबाहेरुनच कंपनीचा पसारा काय आहे याचा अंदाज आला. गेटपासून आतल्या भिंतीवर थोड्या थोड्या अंतरावर खूप चांगले मराठी / हिंदी असे मोटिव्हेशनल कोट्स लावले होते. आम्ही आत गेल्या गेल्या अकाउंट डिपार्टमेंट चे हेड आमच्याकडे आले आणि हात जोडून "गुड मॉर्निंग...वेलकम टू राजेश इंडिया" म्हणून आमचं स्वागत केलं. गाडी पार्किंग एरिया मध्ये पार्क करून आम...