मला टीव्ही पाहायला फारसा आवडत नाही पण रात्री जेवताना चालू असल्यामुळे जेवण होईपर्यंत जे काही चालू असेल ते बघावं लागतं. आज "दोन स्पेशल" हा कार्यक्रम बघण्याचा योग आला. अशोक सराफ आणि निर्मिती सावंत हे आजचे पाहुणे होते. दोन्ही कलाकार माझे आवडते म्हणून इंटरेस्टने त्यांचे किस्से ऐकत होतो. त्यात अशोक सराफ यांनी सांगितलेला किस्सा मनाला फारच स्पर्शून गेला.
कलाकार जरी असला तरी त्याला स्वतःच भावविश्व असतं. त्यालाही भावना असतात. त्याचंही कुणाशी नातं असतं अशा जितेंद्र जोशींच्या विषयावर "कलाकाराच्या भावविश्वाशी कुणाला काही घेणं देणं नसतं. त्याने त्याचं काम करत राहिलं पाहिजे", म्हणत त्यांनी किस्सा सांगायला सुरुवात केली. अशोक सराफ यांच्या एका विनोदी सिनेमाचं शूटिंग चालू होतं आणि त्याचवेळी त्यांचे बाबा सिरिअस होते. त्यांचा छोटा भाऊ हॉस्पिटलमध्ये वडिलांसोबत होता. बाबा हॉस्पिटलमध्ये सिरिअस असताना मनाची घालमेल होणं अगदी स्वाभाविक आहे. प्रत्येक सीननंतर ते भावाला फोन करून परिस्थिती विचारत होते. फोनवर भाऊ फक्त श्वास चालू आहे एवढंच कन्फर्म करत होता.
कलाकार जरी असला तरी त्याला स्वतःच भावविश्व असतं. त्यालाही भावना असतात. त्याचंही कुणाशी नातं असतं अशा जितेंद्र जोशींच्या विषयावर "कलाकाराच्या भावविश्वाशी कुणाला काही घेणं देणं नसतं. त्याने त्याचं काम करत राहिलं पाहिजे", म्हणत त्यांनी किस्सा सांगायला सुरुवात केली. अशोक सराफ यांच्या एका विनोदी सिनेमाचं शूटिंग चालू होतं आणि त्याचवेळी त्यांचे बाबा सिरिअस होते. त्यांचा छोटा भाऊ हॉस्पिटलमध्ये वडिलांसोबत होता. बाबा हॉस्पिटलमध्ये सिरिअस असताना मनाची घालमेल होणं अगदी स्वाभाविक आहे. प्रत्येक सीननंतर ते भावाला फोन करून परिस्थिती विचारत होते. फोनवर भाऊ फक्त श्वास चालू आहे एवढंच कन्फर्म करत होता.
अशाच एका सीनच शूटिंग संपवून अशोकजींनी भावाला फोन केला आणि भावाने "ओव्हर" असं सांगितलं. आता बाबा या जगात नाही हे ऐकल्यावर त्यांची अवस्था काय झाली असेल हे त्यांनाच माहित. अजून तीन चार सीन शूट होणं बाकी होतं. अशावेळी कुणीही व्यक्ती लगेच हातातल्या सर्व गोष्टी सोडून हॉस्पिटलमध्ये निघाला असता आणि कुणीच काही म्हणू शकलं नसतं. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी शुटिंग सुरु ठेवायला सांगितलं. स्वतःचे सगळे सीन शूट करून घेतले. कोणता सीन बाकी नाही ना? याची खात्री करून घेतली आणि मगच ते तिथून निघाले. "माझ्या वैयक्तिक गोष्टीसाठी मी बाकी कुणाचं नुकसान का करु? जे घडायचं आहे ते घडून गेलंय ते मला स्वीकारलच पाहिजे. विदूषकाचं कसं असतं? त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय चाललंय हे त्याच त्याला माहित. जगाला हसवणं हे त्याचं काम", हे त्यांचं वाक्य भावलं.
जगातल्या सर्वच मोठ्या व्यक्तींनी वैयक्तिक आयुष्यापेक्षा त्यांच्या कामाला आणि कमिटमेंटलाच जास्त महत्व दिलं आणि म्हणूनच कदाचित ते लोकांच्या मनावर राज्य करू शकले.
Mast dada ..
ReplyDeleteसर, मला तुमचे सर्व लेख खूप आवडतात .... तुम्ही प्लीज लिहत राहा...
ReplyDeleteखूप छान ।। मस्त ।।☺️😊👍