Skip to main content

संदेश दादास पत्र




संदेश दादा,

ज्याच्या नावातच मेसेज आहे असा तू.  मला आठवत मी नववीला असेन तेव्हा तुझी आणि माझी भेट झाली.  लिखाणाची सवय मला त्यावेळी तुझ्यामुळे लागली (मध्ये खूप मोठा गॅप झाला पण गेल्या एक दोन वर्षांपासून पुन्हा सुरुवात केलीच).  तुझे आर्टिकल्स त्यावेळी वाचायचो आणि त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न करायचो.  ते जेव्हा तुला वाचायला दिलं त्यावेळी "स्वतःच अस काहीतरी लिही" असं समजावणार पत्र तू मला लिहिलंस.  पण त्यावेळी शाळेच्या पुस्तकाबाहेर वाचनच नव्हतं तर काय लिहिणार?  थोडे प्रयत्न केले पण नंतर बंद झालं.  आता जेव्हा ब्लॉग लिहायला लागलो तेव्हा अगोदर मेसेज तुला पाठवायचो.  तुझा रिप्लाय पण अगदी सविस्तर आणि थेट शब्दात असायचा.  तुझ्याकडे पूर्वीपासून मी समीक्षक म्हणूनच बघायचो आणि ती भूमिका तू व्यवस्थित पार पाडतोस.  माझं पुस्तक यावं अशी तुझी इच्छा आहे.  आता लिखाणाची आवड पुन्हा लागलीय तर नक्कीच येईल.  याची बीज तूच तर पेरलीस माझ्या कुमारभारती वयात ☺

मला नाटकाची सवय पण तूच लावलीस.  पाहिलं तिकीट काढून आणलेलंस "तू तू मी मी" चं.  त्यानंतर मी स्वतः जाऊन नाटकं बघायला लागलो.  मला "तू तू मी मी" ची गाणी अजून पाठ आहेत 😎  तुझ्याबरोबर एका एकांकिका स्पर्धेत भाग घेण्याचं भाग्य चालून आलं होतं पण माझा भोळसटपणा आडवा आला आणि आपली ती संधी हुकली.  तू गावाला असे प्रयोग करतोस मला माहित होतं.  तू, दादा आणि कृष्णा दादाने मला कलाकार होण्यास उस्फुर्त केलंत.  अकरावीला पहिला प्रयत्न केला आणि तो जोरदार हिट झाला.  त्यानंतर अभिनयाची गोडी लागली ती आजपर्यंत आहे.  अल्फा महाकरंडकला माझा आवाज थिएटर माईकवर कसा प्रोफेशनल आहे हे तू मला सविस्तर वर्णन करून सांगितलं होतंस.  स्वतः स्वप्नील जोशीला जाऊन "हा विनोद आणि सुबोध जर या इंडस्ट्री मध्ये आला असता तर तुझं मार्केट डाउन होत" हे बोलण्याइतपत तुझा आमच्यावर प्रेम आणि विश्वास आहे. 

आपल्या फ़ंक्शनला तू यावास हा माझा नेहमीच अट्टाहास असतो आणि तू येतोस.  तुझ्यालेखी मी एक कलाकार आहे आणि ते क्षण मी जगत असताना मी कलाकार म्हणूनच जगावं अशी प्रबळ ईच्छा असणारी व्यक्ती म्हणून तू मला समोर हवा असतोस.  तुझ्यासाठी लिहिण्यासारखं खूप आहे.  पण आता इथेच थांबतो.  काही नाती रक्ताची नसतात पण त्याच महत्व त्यापेक्षा खूप जास्त असत.  मी दादा तू आणि कृष्णा दादा यात कधी भेदभाव केला नाही.  माझ्या मोठ्या भावांपैकीच तुम्ही 😘 तुझ्यासाठी माझं एखाद पुस्तक आणि नाटक नक्कीच येईल ये वादा रहा 😁

तुझाच,
सुबू

Comments

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

आयत्या बिळात नागोबा!!!

=======================================================================  हा छोटासा लेख मला आलेल्या बँक फ्रॉड कॉल्सपैकी एक अनुभव आहे.  नक्की वाचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. =======================================================================  कालच मला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि समोरची व्यक्ती ती बँकेतून बोलत आहे अशी मला भासवत होती.  माझा आधार कार्ड बँकेला लिंक नसल्याने माझं  ATM कार्ड ब्लॉक झालं आहे असे थातूर मातूर कारण सांगून त्या व्यक्तीने माझ्याकडून बँकेच्या कार्ड आणि पिन बद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला.  मीही मला काहीच समजत नाही आणि कार्ड ब्लॉक झाल्यामुळे घाबरलो आहे असं दाखवून त्याला सगळी खोटी माहिती दिली.  नंतर त्याने बँकेची माहिती अपडेट होण्यासाठी तुम्हाला तासभर मोबाईल बंद ठेवावा लागेल असं सांगून फोन ठेवून दिला.  माझी ती खोटी माहिती वापरताना चूकीची आहे समजल्यावर त्याने मला शिव्या जरूर घातल्या असतील पण हे सामान्य माणसाला कसे फसवतात व काय सांगतात हे मला जाणून घ्यायचे होते.  ही केस तुमच्याबरोबर सुद्धा होऊ शकते.  आपण फेसबुक, ट्विटर अशा बऱ्याच ठिकाणी आपल

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी