Skip to main content

संस्काराचे भजी


- सुबोध अनंत मेस्त्री

"आई तू पप्पाला मारायची भरपूर लहानपणी?", सार्थकने आईला प्रश्न केला.

"तुझा पप्पा काय पण सांगतो.  एवढी पण काय मारत नव्हते.  पोरं मस्तीच तेवढी करायची तर काय?  मोठे पप्पा (दादा) आणि अण्णा मस्ती करायचे.  हा नसायचा त्यांच्यात.  उगाच कायपण सांगत बसतात .  बायकांना खरं वाटायचं आधी यांच्या", आई कोणती गोष्ट कुठे जोडेल याचा नेम नाही.

"पण एकदा घरी कुणीतरी आलेल  आणि मोठे पप्पा आणि पप्पांना पैसे दिलेले.  त्यांनी जाऊन भजी खाल्लेली ना.", सार्थक मला चिडवत मोठमोठ्याने हसायला लागला आणि नंतर म्हणाला,"तेव्हा मारलेलास ते पप्पाला", पुन्हा हसायला लागला.  त्याला कधीतरी हे मी किंवा दादाने सांगितलं असेल

"तुला बरं हे सगळं आठवतं.  मारायलाच पाहिजे.  हावरेपणा केल्यावर मग काय?  म्हणून तुला पण सांगत असते कुणी काही दिल्यावर लगेच त्यांच्या समोर खायला घ्यायचं नाही किंवा कुणी काही देत असेल तर लगेच घ्यायचं पण नाही",  स्वतःवर डाव पलटलेला पाहून तो पुन्हा आपल्या वहीवर अभ्यास करण्यात रमला.  अभ्यास करताना असाच मध्ये काहीतरी विषय काढून टंगळ मंगळ करणं त्याच्यासाठी काही नवीन नाही.  

आयुष्यात काही क्षण ठळक लक्षात राहतात त्यातला हा एक.  आई-पप्पांनी आमच्यावर संस्कार करताना कधी कोणत्या गोष्टीची कमी ठेवली नाही.  कधी प्रेमाने समजावलं आणि ते ऐकलं नाही तर हातात मिळेल त्या वस्तूने. 

मी खूप लहान असतानाची ही गोष्ट.  कदाचित पहिली दुसरीला असेन.  त्यावेळी माझी कुणी चुलत मावशी आमच्या चाळीतल्या घरी आली होती.  पूर्वीच्या पाहुण्यांमध्ये एक पद्धत होती जी अजूनही दिसते.  ते घरी येताना खाऊ घेऊन यायचेच पण निघताना सुद्धा काही ना काही पैसे हातावर ठेवून जायचे.  त्यात आम्ही तीन भाऊ.  मग तिघांमध्ये त्या गोष्टींच्या वाटण्या व्हायच्या आणि नंतरच खायची परवानगी असायची.  या मावशीने निघताना मी लहान असल्याने माझ्या हातात 5 रुपयाची नोट ठेवली.  आता सहाजिकच तिघांमध्ये वाटणी होणं क्रमप्राप्त होत.  त्यावेळी नेमका अण्णा घरी नव्हता.  दादा आणि मी लगेच आनंदात घराच्या दरवाजावर आलो.  आईकडे पाहिलं सुद्धा नव्हतं.  बायकांचं निरोपाच संभाषण जवळपास अर्धा तास चालत राहत तस यांचंही चालूच होत.  ज्या काळात खाऊसाठी आमच्या हातात 20-25 पैसे यायचे तिथे एकाच वेळी 5 रुपये आल्यावर आम्ही दोघेही भारावून गेलो होतो.

"चल काहीतरी खाऊन येऊया", दादाने सुचवलं.  अशा भन्नाट आणि धडाडीच्या कल्पना दादालाच सुचू शकतात. 

आम्ही घरातून निघालो.  आमच्या चाळीबाहेर एक छोटा आडवा रोड लागतो तो पार केला की पुढे रोडला लागूनच एक चाळ आहे आणि  मग मोठा आडवा रोड जिथे मार्केट भरतं.  त्या ठिकाणी भगवती नावाच एक छोटं हॉटेल होत.  तिथे आम्ही दोघेही गेलो.   दादाने  कांदाभजी ऑर्डर केली आणि आम्ही दोघांनीही मिळून त्या गरमागरम कंदभाजीवर ताव मारला.  5 रुपये एकाच वेळेत संपले होते.  घरी कोणते भजी मिळणार याची आम्हा दोघांना थोडीसुद्धा कल्पना नव्हती.  घरी गेलो तेव्हा मावशी निघून गेली होती आणि आई रागातच होती.  मुळात समोरच्याने पैसे ऑफर केल्यावर लगेच पैसे का घेतले हा तिचा राग होता.  तिने आल्या आल्या आम्हाला तिचा राग बोलून दाखवला आणि पैसे गल्ल्यात टाकून ठेवायला सांगितले. 

"आई, मी आणि याने भजी खाल्ले", दादाने दबकून सांगितलं.
"सगळ्या पैशाचे?", आई अजूनच चिडली आणि आम्ही काही बोलत नाही बघून आम्हाला एका बाजूला उभं करून एक दोन वेळा पायावर पट्ट्या मारल्या.  आई अशी मारायला लागली की आम्ही आधीच मोठमोठ्याने ओरडायचो.  त्याने चाळीतली माणसं बाहेर येऊन बघायची.  आम्हाला वाटायचं की त्यातलं कुणीतरी मध्ये येऊन अडवेल.  पण कसलं काय?  चाळीतली मोठी माणसं बाहेरच्या बाहेर बघून मजा घ्यायची.  रडण्याचा आवाज वाढला की आई लाटणं बाहेर काढायची आणि "आवाज बंद कर नाहीतर घशात घालेन", अस बोलून तोंडासमोर लाटणं आणायची.  शांत नाही बसलो तर खरोखरच लाटणं घशात जाईल म्हणून आम्ही मुसमुसत रडत राहायचो.  त्या दिवशी आई खूपच चिडली होती.  "यापुढे जर अस वागलात तर तुम्ही आणि मी.  कुणी काही खायला आणलं तरी हावऱ्यासारखं त्यांच्यासमोर खायला घ्यायचं नाही.  पाहुणे गेले की मगच सगळ्यांनी वाटून खायचं". 

त्या दिवसानंतर केव्हाही कुणी पैसे द्यायला लागलं की "नाही" म्हणायची सवय लागली.  त्यात कुणी जबरदस्ती हातात टेकवलेच तर आधी आईकडे बघायचो आणि आईने होकार दिला तरच घ्यायचो.  पाहुणे गेल्यावर ते पैसे आधी आईकडे जायचे व नंतर त्यातून काही हिस्सा आमच्या वाट्याला यायचा.  पाहुण्यांनी काही खायला आणलंच तरी ते पाहुणे घरातून निघेपर्यंत वाट पाहायचो आणि मगच आईला विचारून खायला घ्यायचो.  असं आईने कधी मारलं की तिचा राग यायचा. पण आई पप्पांच मन हे आम्ही स्वतः त्या भूमिकेत गेल्यावर जास्त कळायला लागलं.  हल्ली मुलांवर काहीही कारणाने हात उठवणे म्हणजे ते त्या मुलांवर अन्याय केल्यासारखं दाखवल जात.  काही मुलांना त्यांचे पालक एवढे लाडावून ठेवतात की मुलांवर रागावणंसुद्धा त्यांना जड होऊन जातं आणि पुढे तीच मुलं हट्टी होऊन त्यांच्या नियंत्रणाबाहेर जातात. 


आमच्या आई पप्पानी आम्हाला लहानपणी खूप वेळा मारलं अस आठवत नाही पण जेव्हा जेव्हा मारलं ते कायम लक्षात राहील अस वातावरण तयार करून. त्यांचा धाक पण कायम राहिला आणि आदरयुक्त भीतीही.  आजच्या पालकांनी स्वतःच्या जबाबदाऱ्या सांभाळताना हे करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे अस बऱ्याच वेळेला वाटून जातं.

=========================================

- सुबोध अनंत मेस्त्री
9221250656

#sahajsaral

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आपली संस्कृती ते प्रगती - राजेश मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रा. लि.

  काल राजेश इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. या वसईतील कामन विभागातील कंपनीला भेट देण्याचा योग आला. राजाराम फुलेजी यांना यावर्षी "महाराष्ट्र बिझनेस क्लब" प्रस्तुत "उद्योग गर्जना २०२५" मध्ये "उद्योगतारा" या सन्माननीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अडवायजारी बोर्ड मेंबर महेश चव्हाण यांच्यामुळे राजारामजींची ओळख झाली होती. महेश कडून त्यांच्या कंपनीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि ते काल प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. वेळेच्या जवळपास पाऊणतास आधी आम्ही त्यांच्या फॅक्टरीला पोहचलो. वसई स्टेशन तिथून लांब असल्यामुळे कार घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्यासोबत माझे मित्र आणि पार्टनर्स अमित देशमुख आणि अमित लाकरा होते. गेटबाहेरुनच कंपनीचा पसारा काय आहे याचा अंदाज आला. गेटपासून आतल्या भिंतीवर थोड्या थोड्या अंतरावर खूप चांगले मराठी / हिंदी असे मोटिव्हेशनल कोट्स लावले होते. आम्ही आत गेल्या गेल्या अकाउंट डिपार्टमेंट चे हेड आमच्याकडे आले आणि हात जोडून "गुड मॉर्निंग...वेलकम टू राजेश इंडिया" म्हणून आमचं स्वागत केलं. गाडी पार्किंग एरिया मध्ये पार्क करून आम...

अडोलसन्स

  अडोलसन्स एक वेगळा विषय म्हणून बरीच चर्चा झालेली अडोलसन्स ही नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज पाहिली. अगदी मोजक्या ४ एपिसोडमध्ये विषयाचं गांभीर्य मांडण्यात दिग्दर्शक आणि टीम यशस्वी झाली आहे. एक जेमी नावाचा १३ वर्षाचा मुलगा आपल्याच वर्गातल्या मुलीचा खून करतो आणि त्याबद्दलच्या इन्वेस्टीगेशन बाबतीतच ही वेबसिरीज आहे. पहिल्या एपिसोडमध्ये अटक, दुसऱ्या एपिसोडमध्ये शाळेचं वातावरण, तिसऱ्या एपिसोडमध्ये जेमीची मानसिकता आणि चौथ्या भागात जेमीच्या कुटुंबियांना समाजाचा होणारा त्रास अशा सगळ्या अँगलना कव्हर करत ही वेबसिरीज आपल्याला विचार करायला भाग पाडते. अगोदर नाटकासारखी रिहर्सल करून सलग शूट झालेला प्रत्येक एपिसोड असल्यामुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे अजून जिवंतपणा आणि नैसर्गिकता येते. मुलं लहान असल्यापासून पालक म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणारे आपण त्यांना कायम मॉनिटर्ड ऍक्सेस देणं विसरतो आणि मुलांची प्रायव्हसी म्हणून आपण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतो. मुळात ते द्यायलाच हवं पण ते एका विशिष्ट वयानंतर. पौगंडावस्थेत असताना (खासकरून १२ ते १७ वयोगट) आपल्यासमोर अगदी सहज वावरणारी बरीच मुले इंटरनेटच्य...

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...