नो ऍक्शन सीक्वेंस…नो रोमांटिक सिन्स…ना मसाला…ना खूप लक्षात राहतील अशी गाणी…फक्त कंटेंट स्ट्राँग असेल तर एक अख्खा मूवी तुम्ही कुठेही विचलित न होता पाहू शकता आणि प्रचंड सकारात्मकता घेऊन थिएटर बाहेर पडू शकता….श्रीकांत पाहिल्यावर हा अनुभव आला. माणसाने जर ठरवलं तर त्याच्यासाठी कोणतंच लिमिटेशन राहत नाही…जन्मापासून आंधळा व्यक्ती आयुष्यात स्वतःच्या हिंमतीवर ठरवलं ते सगळं मिळवू शकतो…अगदी सिस्टमला चॅलेंज करून बदलण्यास भाग पाडू शकतो…सत्य घटना आहे हे माहीत नसतं तर कदाचित फक्त मूव्ही म्हणून एंजॉय केला असता पण रिअल श्रीकांत शेवटी जेव्हा स्क्रीनवर येतो तेव्हा फक्त अभिमान वाटत नाही तर एक वेगळीच ऊर्जा मिळते… आंधळा मुलगा जन्माला आला म्हणून नातेवाईकांपासून शेजारचे नुकत्याच जन्मलेल्या श्रीकांतला संपवण्यासाठी त्याच्या आई बाबांना उपदेश करतात आणि त्यावेळी ते पाप होता होता राहिलं म्हणूनच आज एक जबरदस्त प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आपल्यामध्ये राहिलं…बापाला श्रीकांतच्या भविष्याची चिंता असते म्हणूनच की काय संपूर्ण चित्रपटात सतत “पापा कहेते है बडा नाम करेगा” हे आपल्या ओळखीच ९० च्या दशकातलं गाणं वाजत राहतं आण...