Skip to main content

Posts

Showing posts from May, 2024

“श्रीकांत” - एक प्रेरणादायी अनुभव

  नो ऍक्शन सीक्वेंस…नो रोमांटिक सिन्स…ना मसाला…ना खूप लक्षात राहतील अशी गाणी…फक्त कंटेंट स्ट्राँग असेल तर एक अख्खा मूवी तुम्ही कुठेही विचलित न होता पाहू शकता आणि प्रचंड सकारात्मकता घेऊन थिएटर बाहेर पडू शकता….श्रीकांत पाहिल्यावर हा अनुभव आला. माणसाने जर ठरवलं तर त्याच्यासाठी कोणतंच लिमिटेशन राहत नाही…जन्मापासून आंधळा व्यक्ती आयुष्यात स्वतःच्या हिंमतीवर ठरवलं ते सगळं मिळवू शकतो…अगदी सिस्टमला चॅलेंज करून बदलण्यास भाग पाडू शकतो…सत्य घटना आहे हे माहीत नसतं तर कदाचित फक्त मूव्ही म्हणून एंजॉय केला असता पण रिअल श्रीकांत शेवटी जेव्हा स्क्रीनवर येतो तेव्हा फक्त अभिमान वाटत नाही तर एक वेगळीच ऊर्जा मिळते… आंधळा मुलगा जन्माला आला म्हणून नातेवाईकांपासून शेजारचे नुकत्याच जन्मलेल्या श्रीकांतला संपवण्यासाठी त्याच्या आई बाबांना उपदेश करतात आणि त्यावेळी ते पाप होता होता राहिलं म्हणूनच आज एक जबरदस्त प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आपल्यामध्ये राहिलं…बापाला श्रीकांतच्या भविष्याची चिंता असते म्हणूनच की काय संपूर्ण चित्रपटात सतत “पापा कहेते है बडा नाम करेगा” हे आपल्या ओळखीच ९० च्या दशकातलं गाणं वाजत राहतं आण...

जीवात्मा जगाचे कायदे

  "चांगली कर्म करशील तर स्वर्गात जाशील नाहीतर नरकात जाशील", अशी वाक्य सहजासहजी लहानपणापासून आपल्या कानावर पडत आली असतील. "मेल्यानंतर कुणी बघितलंय रे...जे आहे ते सगळं इकडेच", हे वाक्य सुद्धा अगदी कॉमन. पण पृथ्वीवर फक्त आपण आपल्या आत्म्याचा विकास करण्यासाठी आलोय अशा अनुषंगाने "जीवात्मा जगाचे कायदे - लॉज ऑफ द स्पिरिट वर्ल्ड" हे खोरशेद भावनगरी यांचे पुस्तक आपल्याला मार्गदर्शन करते. खोरशेद भावनगरी यांची दोन मुले अगदी तरुण वयात मोटार अपघातात दगावली. उतार वयात हा धक्का त्यांना सहन झाला नाही. त्यांना ही घटना मान्य होत नव्हती. अशा काही व्यक्ती आहेत ज्या जीवात्मा जगाशी आपल्याला संपर्क करून देतात हे त्यांना कुणीतरी सुचवले. व त्यांच्या मदतीने खोरशेद यांनी स्वतःच्या दोन्ही मुलांच्या आत्म्याशी संपर्क सुरू केला. त्यांच्या मुलांनी मृत्यूनंतरच्या आयुष्यावर सांगितलेल्या गोष्टींवर हे पूर्ण पुस्तक आधारित आहे. बऱ्याच गोष्टी मानन्या न मानन्यावर आहेत पण शिकण्यासारखं या पुस्तकातून बरच काही आहे. जसं की, एखाद्याला मदत केल्यावर तो विचारसुद्धा तुमच्या मनाला पुन्हा शिवला नाही...